शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

'काहीही फरक...'; अमित शाह अन् महाराष्ट्रातील खासदारांच्या भेटीवर बसवराज बोम्मई बरळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 12:44 IST

महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रकर्नाटकच्या सीमाप्रश्न पेटला असताना, त्यावर फुंकर घालण्यासाठी आता केंद्र सरकार पुढाकार घेणार आहे. सीमावर्ती भागातील मराठी भाषकांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात आपण स्वत: हस्तक्षेप करू, तसेच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिले.

मविआ खासदारांनी शुक्रवारी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात तणावाची स्थिती असून, हिंसाचार उफाळला आहे, याकडे या बैठकीत खासदारांनी शहा यांचे लक्ष वेधले. मराठी भाषकांवर वारंवार हल्ले केले जात आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानामुळे ही स्थिती गंभीर झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला. मात्र यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत गृहमंत्र्यांना भेटून काहीही फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे. 

महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाबाबत मी कर्नाटकच्या खासदारांना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी कळवलं आहे. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे, असं बसवराज बोम्मई यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, १२ डिसेंबरला गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यानंतर, महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, प्रियांका चतुर्वेदी, ओम राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, फौजिया खान, डॉ.अमोल कोल्हे, काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, रजनी पाटील यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

चार खासदार पंतप्रधानांना भेटले-

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व मध्य प्रदेशच्या राज्यसभेतील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यात महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश होता. यावेळी वादग्रस्त मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झाली नाही. भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांना पत्र पाठविले होते. ते पत्र व या बैठकीचा संबंध नाही. ही नियमित बैठक होती. अशा बैठकीत पंतप्रधान राज्यातील प्रश्न समजून घेतात, असे भाजपचे खा. प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खा. उदयनराजे भोसले, खा. धनंजय महाडिक व खा. डॉ.अनिल बोंडे उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAmit Shahअमित शाहKarnatakकर्नाटकBJPभाजपा