शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जो पक्ष तुमचं वेल्फेअर करत नाही, त्या पक्षाला फेअरवेल द्या- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 13:59 IST

पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

चित्रदुर्ग: कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसतसे काँग्रेस आणि भाजपाचे एकमेकांवरील हल्ले वाढताना दिसताहेत. आज चित्रदुर्गमध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसकडून स्थानिक वीरांचा नव्हे, तर सुलतानांचा सन्मान केला जातो, अशा शब्दांमध्ये मोदी काँग्रेसवर बरसले. जो पक्ष गरिबांचं वेल्फेअर करत नाही, त्या पक्षाला जनतेनं फेअरवेल द्यावं, असं आवाहन मोदींनी यावेळी केलं. 'काँग्रेसला दिल (मन), दलितांची नव्हे, तर केवळ डिलची (व्यवहार) चिंता आहे,' असा घणाघाती हल्ला मोदींनी चढवला.'दलित आईच्या पोटी जन्माला आलेल्या थोर वीरांगना वीरा मरकडी यांना मी वंदन करतो. त्यांच्याकडून आपण शौर्य आणि साहस शिकायला हवं. मात्र देशात एक असा पक्ष आहे, जो राजकारणासाठी इतिहास आणि भावनांचा आदर करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. 'ज्यांची जयंती साजरी करायला हवी, त्यांची जयंती काँग्रेस पक्ष साजरी करत नाही. काँग्रेस पक्ष वीरा मरकडीला विसरला. मात्र मतांसाठी सुलतानांची जयंती बरोबर साजरी केली जाते. हा चित्रदुर्गमधील जनतेचा अपमान आहे,' अशी टीका मोदींनी केली.  काँग्रेसच्या नेत्यांना लोक त्यांच्या डीलमुळेदेखील ओळखतात, असंही मोदींनी जनसभेला संबोधित करताना म्हटलं. 'काँग्रेस पक्ष ना दिलवाल्यांचा आहे, ना दलितांचा आहे, तो फक्त डिलवाल्यांचा आहे,' असा हल्लाबोल मोदींनी केला. यावेळी मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरही टीका केली. 'इथले मुख्यमंत्री त्यांच्या सुटकेसमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊनच फिरतात. त्यांच्या मंत्र्यांवर आरोप होताच, ते लगेच सही करुन सर्टिफिकेट देऊन टाकतात. काँग्रेस पक्ष तुमच्या वेल्फेयरचा विचार करत नसेल, तर त्यांना फेयरवेल देण्याची वेळ आलीय,' असं मोदी म्हणाले.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस