शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Karnal Protest : जय जवान-जय किसान, एकीकडे झोपले शेतकरी अन् दुसरीकडे सैन्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:20 IST

शेतकऱ्यांवर २८ ऑगस्टला बास्तारा येथील टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीसांनी लाठीमार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कर्नाल येथील सचिवालयाला घेराव टाकण्याचा इशारा दिला होता

ठळक मुद्देअन्नदाता शेतकरी आणि देश रक्षणासाठी लढणारा जवान हे देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. मात्र, हे दोन्हीही रस्त्यावर झोपल्याचे एकाच छायाचित्रात कैद झाले

कर्नाल : गेल्या महिन्यात शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराविराेधात आक्रमक झालेल्या हरयाणातील हजारो शेतकऱ्यांनी कर्नाल येथील मिनी सचिवालयाला घेराव टाकला. बॅरिकेड्स तोडून शेतकरी सचिवालयापर्यंत पोहोचले. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात १० जण जखमी झाले आहेत. तरीही, शेतकरी मागे हटले नाहीत. रात्रीही सचिवालयाच्या बाहेरच झोपून त्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. या दरम्यान, झोपलेल्या शेतकरी आणि सैन्य दलातील जवानांचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

शेतकऱ्यांवर २८ ऑगस्टला बास्तारा येथील टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीसांनी लाठीमार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कर्नाल येथील सचिवालयाला घेराव टाकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर, शेतकऱ्यांनी मंगळवारी कर्नाल येथील सचिवालयाला घेराव घातला. यावेळी, रात्र रस्त्यावर झोपूनच काढली. शेतकऱ्यांसह सैन्य दलातील सुरक्षा जवानांनीही रस्त्यावरच पाठ मोकळी केली. अन्नदाता शेतकरी आणि देश रक्षणासाठी लढणारा जवान हे देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. मात्र, हे दोन्हीही रस्त्यावर झोपल्याचे एकाच छायाचित्रात कैद झाले. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतकरी आंदोलनाचे अपडेट देणाऱ्या एका ट्विटर हँडलनेही हे फोटो शेअर केले आहेत.  

राज्य सरकारसोबतची चर्चा फिस्कटली

पोलिसांच्या लाठीमारात अनेक शेतकरी आणि काही पोलीस जखमी झाले होते. एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला होता. जिल्हाधिकारी आयुष सिन्हा यांनी यावेळी शेतकऱ्यांची डोकी फोडा, असे वादग्रस्त आदेश दिल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य किसान मंचतर्फे महापंयाचत बोलाविण्यात आली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी हजारोंच्या संख्येने शेतकरी त्यात सहभागी झाले होते. इतर राज्यातील शेतकऱ्यांचीही महापंचायतमध्ये उपस्थिती होती. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ११ सदस्यीय शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले होते. मात्र, ही चर्चा फस्कटली. 

सहभागी शेतकरी नेते

भारत किसान युनियनचे नेते राकेश टीकैत यांच्यासह याेगेंद्र यादव, बलबीरसिंग राजेवाल, जोगींदरसिंग उग्रहान, दर्शन पाल यांच्यासह संयुक्त किसान मोर्चाचे नेते सहभागी झाले हाेते. मात्र, पाेलीसांनी सर्व नेत्यांना नमस्ते चौकाच ताब्यात घेतले. आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार, वादग्रस्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निलंबनावर शेतकरी ठाम 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनkarnal-pcकर्णलHaryanaहरयाणा