शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Karnal Protest : जय जवान-जय किसान, एकीकडे झोपले शेतकरी अन् दुसरीकडे सैन्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:20 IST

शेतकऱ्यांवर २८ ऑगस्टला बास्तारा येथील टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीसांनी लाठीमार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कर्नाल येथील सचिवालयाला घेराव टाकण्याचा इशारा दिला होता

ठळक मुद्देअन्नदाता शेतकरी आणि देश रक्षणासाठी लढणारा जवान हे देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. मात्र, हे दोन्हीही रस्त्यावर झोपल्याचे एकाच छायाचित्रात कैद झाले

कर्नाल : गेल्या महिन्यात शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराविराेधात आक्रमक झालेल्या हरयाणातील हजारो शेतकऱ्यांनी कर्नाल येथील मिनी सचिवालयाला घेराव टाकला. बॅरिकेड्स तोडून शेतकरी सचिवालयापर्यंत पोहोचले. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात १० जण जखमी झाले आहेत. तरीही, शेतकरी मागे हटले नाहीत. रात्रीही सचिवालयाच्या बाहेरच झोपून त्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. या दरम्यान, झोपलेल्या शेतकरी आणि सैन्य दलातील जवानांचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

शेतकऱ्यांवर २८ ऑगस्टला बास्तारा येथील टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीसांनी लाठीमार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कर्नाल येथील सचिवालयाला घेराव टाकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर, शेतकऱ्यांनी मंगळवारी कर्नाल येथील सचिवालयाला घेराव घातला. यावेळी, रात्र रस्त्यावर झोपूनच काढली. शेतकऱ्यांसह सैन्य दलातील सुरक्षा जवानांनीही रस्त्यावरच पाठ मोकळी केली. अन्नदाता शेतकरी आणि देश रक्षणासाठी लढणारा जवान हे देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. मात्र, हे दोन्हीही रस्त्यावर झोपल्याचे एकाच छायाचित्रात कैद झाले. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतकरी आंदोलनाचे अपडेट देणाऱ्या एका ट्विटर हँडलनेही हे फोटो शेअर केले आहेत.  

राज्य सरकारसोबतची चर्चा फिस्कटली

पोलिसांच्या लाठीमारात अनेक शेतकरी आणि काही पोलीस जखमी झाले होते. एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला होता. जिल्हाधिकारी आयुष सिन्हा यांनी यावेळी शेतकऱ्यांची डोकी फोडा, असे वादग्रस्त आदेश दिल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य किसान मंचतर्फे महापंयाचत बोलाविण्यात आली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी हजारोंच्या संख्येने शेतकरी त्यात सहभागी झाले होते. इतर राज्यातील शेतकऱ्यांचीही महापंचायतमध्ये उपस्थिती होती. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ११ सदस्यीय शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले होते. मात्र, ही चर्चा फस्कटली. 

सहभागी शेतकरी नेते

भारत किसान युनियनचे नेते राकेश टीकैत यांच्यासह याेगेंद्र यादव, बलबीरसिंग राजेवाल, जोगींदरसिंग उग्रहान, दर्शन पाल यांच्यासह संयुक्त किसान मोर्चाचे नेते सहभागी झाले हाेते. मात्र, पाेलीसांनी सर्व नेत्यांना नमस्ते चौकाच ताब्यात घेतले. आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार, वादग्रस्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निलंबनावर शेतकरी ठाम 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनkarnal-pcकर्णलHaryanaहरयाणा