शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या स्मरणार्थ पाण्याखाली साकारले अनोखे चित्र, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 21:38 IST

Kargil Vijay Diwas : शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे हे अंडरवॉटर पोर्ट्रेट केरळमधील कलाकार दा विंची सुरेश (Da Vinci Suresh) यांनी बनवले आहे.

कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) यानिमित्त शहीद कॅप्टन विक्रम बत्रा (Captain Vikram Batra) यांचे अनोख्या पद्धतीने स्मरण करण्यात आले. केरळमधील एका कलाकाराने विक्रम बत्रा यांचे पाण्याखाली चित्र बनवले आहे. यासाठी या कलाकाराचे नावही वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.

शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे हे अंडरवॉटर पोर्ट्रेट केरळमधील कलाकार दा विंची सुरेश (Da Vinci Suresh) यांनी बनवले आहे. यादरम्यान तिरुअनंतपुरममध्ये कारगिल विजय दिवस साजरा केला जात होता.

हा कार्यक्रम भारतीय लष्कराने आयोजित केला होता. Pangode Military Station वर झालेल्या या कार्यक्रमात Bond Water Sports Pvt Ltd च्या स्कूबा टीमने लष्कराला सहकार्य केले.

शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे हे पोर्ट्रेट 50 फूट लांब आणि 30 फूट रुंद आहे. Universal Records Forum मध्ये याला स्थान मिळाले आहे. URF च्या टीमने घटनास्थळीच दा विंची सुरेश यांना  वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.

विक्रम बत्रा यांचे पाण्याखाली चित्र काढण्यासाठी दा विंची सुरेश यांना 8 तास लागले. हे चित्र टाइल्सच्या साहाय्याने तयार करण्यात आले होते. दा विंची सुरेश म्हणाले, 'संपूर्ण काम पाण्याखाली करण्यात आले होते, ज्यामुळे ते अधिक खास होते. हा माझा पहिलाच अनुभव होता, मला खूप मजा आली.'

दरम्यान, कारगिल युद्ध 60 दिवसांपेक्षा जास्त काळ चालले होते. 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात भारताचा विजय झाला होता. 3 मे 1999 रोजी युद्ध सुरू झाले. या लढाईला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले. या युद्धात पाकिस्तानशी लढताना 527 भारतीय जवान शहीद झाले होते.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनKeralaकेरळIndian Armyभारतीय जवान