शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसविषयी ज्या व्यक्तीला ABC माहिती नाही त्यांनी..."; गेहलोत यांचा सिब्बल यांच्यावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 20:43 IST

Kapil Sibal And Ashok Gehlot : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सिब्बल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली - पाच राज्यांत झालेला दारुण पराभव, नेतृत्व बदलाची मागणी, काँग्रेसमधून (Congress) होणारे नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे पलायन, अशा अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसचे जुने अथवा वरिष्ठ नेते चिंतीत दिसत आहेत. काँग्रेसची ही घसरण पाहता, पक्षातील वरिष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal), यांनी नेतृत्व बदलासंदर्भात भाष्य केले आहे. काँग्रेसमध्ये सुधारणांची मागणी करणाऱ्या ग्रुप 23 मधील नेत्यांमध्ये कपिल सिब्बल हे, असे पहिले नेते आहेत, ज्यांनी सोनिया गांधी यांना उघडपणे पद सोडण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही, तर आता गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडावा आणि कुण्या दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी सिब्बल (Kapil Sibal) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

अशोक गेहलोत यांनी काँग्रेस पक्षातील एबीसी माहिती नसलेल्या नेत्याने अशा प्रकारचे विधान करणे अपेक्षित नाही असं म्हटलं आहे. तसेच "कपिल सिब्बल एक प्रसिद्ध वकील असून ते काँग्रेसच्या संस्कृतीतून आलेले नाहीत. सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांनी त्यांना अनेकवेळा संधी दिलेली आहे. काँग्रेस पक्षाविषयी ज्या व्यक्तीला ABC माहिती नाही, अशा व्यक्तीने काँग्रेसविषयी विधाने करणे अपेक्षित नाही" असं गेहलोत यांनी म्हटलं आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल म्हणाले, पक्षाचे नेतृत्व कोकीळेच्या धरतीवर (अर्थात सर्व काही ठीक आहे, असे वाटणे, पण वास्तविकतेशी संबंध नसणे.) जगत आहे. 8 वर्षांपासून पक्षाची सातत्याने घसरण होत असतानाही ते जागे होत नाहीत. ही काँग्रेससाठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

"काही लोक काँग्रेसच्या आतील आहेत, तर काही काँग्रेसच्या बाहेरील आहेत. पण खऱ्या आणि सर्वांच्या काँग्रेससाठी, काँग्रेस बाहेरील लोकांचेही ऐकायला हवे. ज्या पद्धतीने काँग्रेसची अधोगती होत आहे, ती मला पाहावली जात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या काँग्रेससाठी संघर्ष करत राहणार. सर्वांची काँग्रेस म्हणजे, केवळ सोबत असणेच नाही, तर भारतातील ज्या लोकांना भाजप नको आहे, अशा सर्व लोकांना एकत्रित आणणे आहे."

"ममता बॅनर्जी असतील, शरद पवार असतील, हे सर्व जन काँग्रेसचेच होते. मात्र, सर्व जण दूर गेले आहेत. या सर्वांना एकत्रित आणायचे आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे, की काही एबीसी लोकांना वाटते, की घरच्या काँग्रेसशिवाय सर्वांची काँग्रेस चालूच शकत नाही. आपल्यासाठी हेच आव्हान आहे. मी कुण्याही एबीसीविरोधात नाही. मात्र, आपल्याला हे आव्हान स्विकारावे लागेल" असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसPoliticsराजकारणAshok Gahlotअशोक गहलोत