शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

कपिल सिब्बलांनी काँग्रेस सोडल्यानंतर केसी वेणुगोपाल म्हणाले, "लोक पक्षात येतात-जातात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 20:57 IST

KC Venugopal : कपिल सिब्बल काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, लोक पक्षात येतच राहतात. कपिल सिब्बल गेली ३० वर्षे काँग्रेस पक्षात होते. केंद्रात काँग्रेस सरकारमध्ये ते अनेकवेळा मंत्रीही झाले.

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षापासून अलिप्त असलेले कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच, समाजवादी पार्टीच्या मदतीने राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही त्यांना राज्यसभेची जागा दिली आहे. कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. आता कपिल सिब्बल काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, लोक पक्षात येतच राहतात. कपिल सिब्बल गेली ३० वर्षे काँग्रेस पक्षात होते. केंद्रात काँग्रेस सरकारमध्ये ते अनेकवेळा मंत्रीही झाले.

एका वृत्तानुसार,केसी वेणुगोपाल यांनी कपिल सिब्बल यांच्या काँग्रेस सोडण्याबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. यासाठी कोणालाही दोषी धरले जाणार नाही. उदयपूरमधील चिंतन शिबिरानंतर नियोजनबद्ध पद्धतीने पक्षाची पुनर्बांधणी सुरू असल्याचे ते म्हणाले. वेणुगोपाल म्हणाले, "कपिल सिब्बल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. पत्रात त्यांनी काँग्रेसच्या मूल्यांवर विश्वास व्यक्त केला होता. त्याशिवाय त्यांनी काही बोलले नाही. त्यांना आधी त्यांची भूमिका स्पष्ट करू द्या, त्यानंतर आम्ही काही बोलू शकतो. काँग्रेस पक्ष खूप मोठा आहे. इथे लोक पक्षात येतात-जातात. काही लोक इतर पक्षात सामील होतात. पक्ष सोडून गेलेल्या कुणालाही मी दोष देऊ इच्छित नाही. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, ज्यामध्ये जागा कमी नाही आहे."

याचबरोबर, "काँग्रेस पक्षाची संपूर्ण पुनर्बांधणी केली जाईल. सर्वसमावेशक पुनर्रचना करून जनतेपर्यंत जाण्याचा पक्षाचा मानस आहे. पक्षातील प्रत्येक व्यक्तीला संघटनेचे काम मिळाले आहे, असे केसी वेणुगोपाल म्हणाले. दरम्यान, याआधी कपिल सिब्बल यांनी उत्तर प्रदेशमधून राज्यसभा सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कपिल सिब्बल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कपिल सिब्बल म्हणाले, "मी काँग्रेसचा नेता होतो, पण आता नाही. मी 16 मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मला काँग्रेससाठी काहीही बोलायचे नाही. ते माझ्यासाठी योग्य नाही. मी अखिलेश यादव यांचा आभारी आहे."

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेस