शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

कपिल सिब्बलांनी काँग्रेस सोडल्यानंतर केसी वेणुगोपाल म्हणाले, "लोक पक्षात येतात-जातात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 20:57 IST

KC Venugopal : कपिल सिब्बल काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, लोक पक्षात येतच राहतात. कपिल सिब्बल गेली ३० वर्षे काँग्रेस पक्षात होते. केंद्रात काँग्रेस सरकारमध्ये ते अनेकवेळा मंत्रीही झाले.

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षापासून अलिप्त असलेले कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच, समाजवादी पार्टीच्या मदतीने राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही त्यांना राज्यसभेची जागा दिली आहे. कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. आता कपिल सिब्बल काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, लोक पक्षात येतच राहतात. कपिल सिब्बल गेली ३० वर्षे काँग्रेस पक्षात होते. केंद्रात काँग्रेस सरकारमध्ये ते अनेकवेळा मंत्रीही झाले.

एका वृत्तानुसार,केसी वेणुगोपाल यांनी कपिल सिब्बल यांच्या काँग्रेस सोडण्याबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. यासाठी कोणालाही दोषी धरले जाणार नाही. उदयपूरमधील चिंतन शिबिरानंतर नियोजनबद्ध पद्धतीने पक्षाची पुनर्बांधणी सुरू असल्याचे ते म्हणाले. वेणुगोपाल म्हणाले, "कपिल सिब्बल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. पत्रात त्यांनी काँग्रेसच्या मूल्यांवर विश्वास व्यक्त केला होता. त्याशिवाय त्यांनी काही बोलले नाही. त्यांना आधी त्यांची भूमिका स्पष्ट करू द्या, त्यानंतर आम्ही काही बोलू शकतो. काँग्रेस पक्ष खूप मोठा आहे. इथे लोक पक्षात येतात-जातात. काही लोक इतर पक्षात सामील होतात. पक्ष सोडून गेलेल्या कुणालाही मी दोष देऊ इच्छित नाही. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, ज्यामध्ये जागा कमी नाही आहे."

याचबरोबर, "काँग्रेस पक्षाची संपूर्ण पुनर्बांधणी केली जाईल. सर्वसमावेशक पुनर्रचना करून जनतेपर्यंत जाण्याचा पक्षाचा मानस आहे. पक्षातील प्रत्येक व्यक्तीला संघटनेचे काम मिळाले आहे, असे केसी वेणुगोपाल म्हणाले. दरम्यान, याआधी कपिल सिब्बल यांनी उत्तर प्रदेशमधून राज्यसभा सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कपिल सिब्बल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कपिल सिब्बल म्हणाले, "मी काँग्रेसचा नेता होतो, पण आता नाही. मी 16 मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मला काँग्रेससाठी काहीही बोलायचे नाही. ते माझ्यासाठी योग्य नाही. मी अखिलेश यादव यांचा आभारी आहे."

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेस