शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

शिवसेना आधी भ्रष्टाचारी नव्हती, आता झाली का? ठाकरेंच्या बाजुने युक्तीवाद करणाऱ्या सिब्बलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 19:56 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधी पक्षांनी देशभरात निदर्शने केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधी पक्षांनी देशभरात निदर्शने केली. यावर देशभरातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, दोन दिवसापूर्वी दिल्लीत विरोधी पक्ष एकत्र येत भाजपविरोधात घोषणा दिल्या. काळे झेंडे दाखवत निषेध केला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.  'सर्व भ्रष्टाचारी एकाच व्यासपीठावर आल्याचे म्हणत टीका केली. यावर आता वकील  कपिल सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

जेडीयू आणि शिवसेना हे एकेकाळी भाजपचे मित्र होते पण आता तेही भ्रष्ट झाले आहेत, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला. 

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'विरोधक घाबरले आहेत आणि सर्व भ्रष्ट एकाच व्यासपीठावर आले आहेत पण मोदीजी, शिवसेना, अकाली दल, जेडीयू, पीडीपी, बसपा हे सर्व पक्ष तुमचे मित्रपक्ष होते आणि तुम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन बनवले होते आता ती भ्रष्ट झाली आहे पण आधी नव्हती का?', असं ट्विट सिब्बल यांनी केले आहे. 

"मोदी ज्या दिवशी PM राहणार नाहीत, त्यादिवशी भारत भ्रष्टाचार मुक्त होईल; कारण...", केजरीवालांचा हल्लाबोल!

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी काही दिवपसापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. अमित शहा कर्नाटकातील जाहीर सभेत म्हणाले होते की, राज्यात कुठेही धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही. यावर कपिल सिब्बल यांनी ट्विट करून टीका केली, अमित शहा, धर्म आधारित कोटा हे संविधानाचे उल्लंघन आहे, पण धर्मावर आधारित राजकारण, प्रचार, भाषण आणि अजेंडा यावर तुमचे काय म्हणणे आहे? ते संविधानाचे उल्लंघन करत नाही का?, असा सवाल सिब्बल यांनी केला आहे. 

मंगळवारी भाजप मुख्यालयात पक्षाच्या नवीन निवासी संकुलाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. 'आज तपास यंत्रणा चौकशी केली जात आहे. भ्रष्टाचाऱ्यांची मुळं हादरली आहेत. सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत. आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम सुरू केली, तर काही पक्षांनी भ्रष्टाचार वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. घटनात्मक संस्थांवर हल्ले होत असून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा