शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पक्षाला अध्यक्षच नाही, मग निर्णय कोण घेत आहे ? काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:50 IST

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी नेतृत्वावरुन आपल्याच पक्षावर निशाणा साधलाय.

नवी दिल्ली: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आता नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा पक्षाला आरसा दाखवला आहे.

'पक्षाला अध्यक्ष नसल्यामुळे ही वेळ'कपिल सिब्बल यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वार टीका केली आहे. ते म्हणाले, 'पक्षातील आमचे लोक आम्हाला सोडून जात आहेत. सुष्मिता जी पार्टी सोडून निघून गेल्या, फेलेरियो गले, सिंधिया गेले, केरळमध्ये सुधीरन गले, जितिन प्रसाद गेले, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. आता प्रश्न पडतो की, ते का सोडत आहेत ? आपलीच काहीतरी चूक होत असेल, ज्यामुळे अनेकजण पक्ष सोडत आहेत. माझ्या मते पक्षाला नेतृत्व नसल्यामुळे ही गळती होत आहे', असं सिब्बल म्हणाले.

'आम्ही किती काळ थांबायचं'

कपिल सिब्बल पुढे म्हणाले, 'मी फक्त एवढेच म्हणेन की प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने पक्षाला आणखी मजबूत करण्याचा विचार करावा. ज्यांनी पक्ष सोडला, त्यांनाही पक्षात परत आणले पाहिजे. आपल्याला मुक्त संवाद संभाषण आवश्यक आहे. आम्ही काँग्रेस कमकुवत होताना पाहू शकत नाही. आता किती दिवस थांबायचं ? पक्षाला नेतृत्व हवंय.'

'काँग्रेसचे नुकसान म्हणजे देशाचे नुकसान'

सिब्बल म्हणाले, 'मी काँग्रेसच्या विरोधात वक्तव्य करत नाही, मी काँग्रेससोबतच आहे. पंजाबमध्ये घडणाऱ्या घटनांवर मी काहीच बोललो नाही. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. पण, जर हे असेच चालू राहिले, तर भविष्यात अवघड परिस्थिती येईल. काँग्रेसचं नुकसान म्हणजे देशाचा पाया कमकुवत होण्यासारखं आहे.'

'अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी'

यावेळी कपिलसिब्बल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीची मागणी केली आहे. ते म्हणाले, 'मागच्या वर्षी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवून प्रश्न उपस्थित केले, त्या नेत्यांच्या बाजुने मी बोलत आहे. तेव्हापासून आम्ही पक्ष हायकमांडच्या कारवाईची वाट पाहत आहोत. पक्षामध्ये अध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समितीची निवडणूक असावी अशी आमची इच्छा आहे', असंही ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसkapil sibalकपिल सिब्बलRahul Gandhiराहुल गांधी