शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
5
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
6
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
7
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
8
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
9
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
10
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
11
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
12
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
13
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
14
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
15
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
16
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
17
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
18
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
19
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
20
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:22 IST

Kanwar Yatra Accident News: कावड यात्रा पूर्ण करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या जत्थ्यामध्ये भरधाव कार घुसून भीषण अपघात घडला. मुंबई-आग्रा महामार्गावर ही घटना घडी आहे. 

Kanwar Yatra Latest News: श्रावणाच्या पवित्र महिन्यात महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी गंगाजल घेऊन निघालेल्या कावड यात्रेकरूंच्या जत्थ्याला भरधाव कारने चिरडले. यात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. २३ जुलै रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, अनेक यात्रेकरून कारने उडवल्यानंतर महामार्गालगत असलेल्या खोल खड्ड्यांमध्ये जाऊन पडले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये ही घटना घडली. कावड यात्रेकरू भदावन येथून गंगेचं पाणी घेऊन परत गावी निघाले होते. मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये शीतला माता देवी मंदिराच्या परिसरातून यात्रेकरू महामार्गाच्या एका बाजूने चालले होते. त्याचवेळी भरधाव कार त्यांच्या जत्थ्यात घुसली. 

आधी उडवले, नंतर चिरडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार खूप वेगात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती १३ भाविकांच्या जत्थ्यात घुसली. कारने आधी उडवले. उडून खाली पडलेल्या काही जणांना चिरडले. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. 

कारचा वेग इतका होता की, भाविकांना उडवल्यानंतर कार उलटली आणि बाजूला जाऊन पडली. कारच्या धडकेमुळे काही भाविक महामार्गाच्या बाजूने असलेल्या खोल खड्ड्यात फेकले गेले होते. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये काही जण कारमधील प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

गावापासून ३५ किमी अंतरावर असतानाच झाला अपघात

गंगेचं पाणी घेऊन येणारे १३ भाविक मध्य प्रदेशातील सीमरिया तालुक्यातील बंजरा का पुरा गावचे आहेत. गावापासून ३५ किमी अंतरावर असतानाच त्यांचा अपघात झाला. पुरन गिरवीर सिंह बंजारा, रमेश नरसिंग बंजारा, दिनेश बेताल सिंह बंजारा, धर्मेंद्र उर्फ छोटू असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. प्राथमिक तपासानुसार, कारचे टायर फुटले आणि त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, अशी माहिती देण्यात आली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूcarकारPoliceपोलिस