शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 14:22 IST

दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली. या आगीत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. आगीमुळे घरात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे पती-पत्नी आणि मोलकरणीचा गुदमरून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच घरातील पाळीव मांजराचाही मृत्यू झाला.

मृतांमध्ये काकादेवच्या पांडू नगर येथील रहिवासी बिस्कीट व्यावसायिक संजय श्याम दसानी, पत्नी कनिका दसानी आणि मोलकरीण छवी यांचा समावेश आहे. दिवाळीच्या दिवशी तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक रात्रीच घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. त्यानंतर घरातील लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री घडली. संजय श्याम दसानी (48) हे त्यांची पत्नी कनिका श्याम दसानी आणि घरातील मोलकरीण छवी चौहान यांच्यासोबत पांडू नगर येथील एका घरात राहत होते. दिवाळीच्या दिवशी पूजेनंतर कुटुंबीय देवघरात दिवा लावून झोपले होते. मात्र याच दरम्यान अचानक आग लागली. त्यामुळे तिघांना जीव गमवावा लागला.

ही आग संपूर्ण खोलीत पसरली, असं सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर घरात धुराचे लोट पसरले, त्यामुळे तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. रात्री १२ वाजल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांसह अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक टीमही तेथे होती. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :fireआगHomeसुंदर गृहनियोजनUttar Pradeshउत्तर प्रदेश