शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 14:22 IST

दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली. या आगीत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. आगीमुळे घरात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे पती-पत्नी आणि मोलकरणीचा गुदमरून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच घरातील पाळीव मांजराचाही मृत्यू झाला.

मृतांमध्ये काकादेवच्या पांडू नगर येथील रहिवासी बिस्कीट व्यावसायिक संजय श्याम दसानी, पत्नी कनिका दसानी आणि मोलकरीण छवी यांचा समावेश आहे. दिवाळीच्या दिवशी तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक रात्रीच घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. त्यानंतर घरातील लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री घडली. संजय श्याम दसानी (48) हे त्यांची पत्नी कनिका श्याम दसानी आणि घरातील मोलकरीण छवी चौहान यांच्यासोबत पांडू नगर येथील एका घरात राहत होते. दिवाळीच्या दिवशी पूजेनंतर कुटुंबीय देवघरात दिवा लावून झोपले होते. मात्र याच दरम्यान अचानक आग लागली. त्यामुळे तिघांना जीव गमवावा लागला.

ही आग संपूर्ण खोलीत पसरली, असं सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर घरात धुराचे लोट पसरले, त्यामुळे तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. रात्री १२ वाजल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांसह अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक टीमही तेथे होती. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :fireआगHomeसुंदर गृहनियोजनUttar Pradeshउत्तर प्रदेश