शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'मी बेरोजगार आहे' म्हणणाऱ्या कन्हैय्या कुमारची संपत्ती खरंच ११८ कोटी?... जाणून घ्या 'इन्कम सोर्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 11:49 IST

कन्हैय्या कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. तर, अनेकांनी बेरोगजगार असलेल्या कन्हैया कुमारच्या संपत्तीची, आणि रोजगारासंदर्भातही प्रश्न उपस्थित केले आहेत.

ठळक मुद्दे कन्हैय्याने दिलेल्या संपत्ती विवरणपत्रानुसार, कन्हैय्या हा बेरोजगार असून त्यांच्याकडे 6 लाख रुपयांची संपत्ती होती.

नवी दिल्ली - डाव्या संघटनांचा नेते कन्हैया कुमार आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमारने, आपण काँग्रेसमध्ये का सामील झालो हे सांगितले. दिल्लीतील जेएनयु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा नेता, सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आज देशातील सर्वात जुन्या, सक्षम विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा बडा नेता बनला आहे. कन्हैय्या कुमारचा ना कोणता उद्योग आहे, ना कुठे नोकरी, तरीही त्याचा खर्च कसा भागतो, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. 

कन्हैय्या कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. तर, अनेकांनी बेरोगजगार असलेल्या कन्हैया कुमारच्या संपत्तीची, आणि रोजगारासंदर्भातही प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकांवेळी कन्हैय्या कुमारच्या संपत्तीवरुन चांगलाच वाद आणि चर्चा रंगली होती. कन्हैय्या कुमारकडे उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नसताना, त्यांची एकूण संपत्ती 18 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता. कन्हैय्या कुमार यांनी 2019 साली बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला. त्यावेळी, कन्हैय्याने दिलेल्या संपत्ती विवरणपत्रानुसार, कन्हैय्या हा बेरोजगार असून त्यांच्याकडे 6 लाख रुपयांची संपत्ती होती. 

निवडणुक आयोगाकडे सादर केलेल्या विवरणपत्रानुसार कन्हैय्या कुमार यांच्याकडे ना घर आहे, ना गाडी. बेगुसरायमधील बीहट या गावी त्यांची थोडी जमीन आहे, तीही त्यांना वारसा हक्काने मिळालेली आहे. त्यामुळे, कन्हैय्या यांच्या रोजगाराचे साधन काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. कन्हैय्या यांनी यापूर्वीही याची माहिती दिली आहे. त्यानुसार, कन्हैय्या यांनी लिहिलेलं 'बिहार टू तिहाड' या पुस्तकातून मिळणारी रॉयल्टी हेच कन्हैय्या यांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे.      

काँग्रेस वाचली नाही, तर देश वाचणार नाही

कन्हैया म्हणाला, मला वाटते, की या देशात काही लोक, केवळ लोक नाही, ते एक विचार आहेत. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुठे तरी वाचले होते, की तुम्ही सर्वप्रथम तुमच्या शत्रूची निवड करा. मित्र, अपोआप तयार होतील. तर मी निवड केली आहे. लोकशाही पक्षात आम्ही यामुळे सामील होत आहोत, कारण जर काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही, असे आता वाटू लागले आहे. 

राहुल गांधींना दिली भेट

कन्हैया म्हणाला, मी स्पष्टपणे सांगतो, की पंतप्रधान आजही आहेत, कालही होते आणि भविष्यातही होतील. पण, आज आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फॉर्म भरत होतो, तेव्हा सहकारी जिग्नेशने एक संविधानाची प्रत आणि मी गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो त्यांना भेट दिला. कारण, या देशाला आज भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि महात्मा गांधींच्या एकतेची आवश्यकता आहे.

मोठं जहाज वाचलं पाहिजे

कन्हैया म्हणाला, जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारHomeघरElectionनिवडणूकcongressकाँग्रेस