शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

कमलनाथ काँग्रेसमध्येच राहणार, राहुल गांधींशी चर्चेनंतर घेतला निर्णय, मात्र नकुलनाथ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 11:44 IST

Madhya Pradesh Politics: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा कालपासून रंगल्याने भोपाळपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, कमलनाथ हे काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा कालपासून रंगल्याने भोपाळपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, कमलनाथ हे काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर कमलनाथ यांनी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे.   मात्र कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांच्यासह काही काँग्रेस आमदार भाजपामध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी, माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा आधीच फेटाळून लावल्या आहेत. मध्य प्रदेशमधील माजी मंत्री सज्जन वर्मा यांनी रविवार १८ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी चर्चा केली होती. कमलनाथ यांच्या निवासस्थानी ही चर्चा सुमारे अर्धा तास चालली होती. या भेटीनंतर सज्जन सिंह वर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, कमलनाथ यांच्यासोबत काही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. राहुल गांधी यांच्याशीही त्यांचं बोलणं झालं आहे. मी ४० वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे. जिथे कमलनाथ असतील. तिथे मी असेन.  कमलनाथ हे आज काँग्रेसमध्ये आहेत आणि उद्याही काँग्रेसमध्येच राहतील. मात्र परवा काय होईल माहिती नाही. प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्याबाबत आमच्या मनात कुठलीही नाराजी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सज्जन सिंह वर्मा यांनी सांगितले की, कमलनाथ यांचं लक्ष सध्या मध्य प्रदेशमधील लोकसभेच्या २९ जागांवर आहे. ते जातीय समिकरणं जुळवत आहेत. कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला नाही, याबाबत विचार करत आहेत, असेही सज्जन सिंह वर्मा यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी कमलनाथ यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, कमलनाथ कुठेही जात नाही आहेत. काही लोकांनी प्रसारमाध्यमांचा वापर करून घेतला. माझी कमलनाथ यांच्याशी चर्चा झाली आहे. माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या ह्या कुठल्यातरी कटकारस्थानाचा भाग आहेत. त्यानंतरच या चर्चांना सुरुवात झाली. ज्या व्यक्तीने पक्ष उभा केला. ज्याला इंदिरा गांधी तिसरा मुलगाा मानायच्या. तो काँग्रेस कसं काय सोडू शकतो, असा सवाल जितू पटवारी यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा