शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

भ्रष्टाचार, अकार्यक्षम मंत्र्यांमुळेच पक्षाचे बुरे दिन; भाजपा आमदारांकडून घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 12:39 IST

कैराना, नुरपूरमधील पराभवानंतर भाजपा आमदारांची राज्य सरकारवर टीका

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कैराना आणि नुरपूरमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला. या पराभवावरुन आता भाजपाच्या दोन आमदारांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 'राज्य सरकारनं अनियंत्रित भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम मंत्र्यांविरोधात कारवाई करायला हवी. अशी कारवाई झाली, तरच पुढील निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी सुधारेल,' असं भाजपाच्या दोन आमदारांनी म्हटलं आहे. गोपामाई मतदारसंघाचे आमदार शाम प्रकाश यांनी कैराना, नुरपूरमधील पराभवासाठी थेट स्वत:च्या सरकारला जबाबदार धरलं आहे. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रकाश यांनी फेसबुकवर एक कविता लिहिली आहे. 'पहले गोरखपूर, फूलपूर और अब कैराना, नुरपूर में बीजेपी की हार का हमें दु:ख है,' असं त्यांनी कवितेत म्हटलं आहे. मोदींच्या नावानं भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, पण सत्तेची सूत्रं संघाच्या हाती आहेत, असंही ते पुढे कवितेत म्हणत आहेत. 'मोदी नाम से पा गये राज, कर ना सके जनता मन काज. संघ, संघटन हाथ लगाम, मुख्यमंत्री भी असहाय,' असं प्रकाश यांनी कवितेत म्हटलं आहे. भाजपाच्या बहुतांश आमदारांची मनातही याच भावना आहेत, असा दावादेखील प्रकाश यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केला. 'अधिकारीवर्ग लोकप्रतिनिधींचं ऐकत नाही, असा संदेश लोकांमध्ये जात आहे. अनियंत्रित भ्रष्टाचारामुळे लोकांच्या मनात राग आहे. मुख्यमंत्र्यांना मोकळेपणानं काम करु दिलं जात नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भाजपाचा राज्यातील भविष्य अंधकारमय असेल,' असंही प्रकाश म्हणाले. बेरिया मतदारसंघाचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनीही राज्य सरकारच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता न दाखवल्यास जनता पुढील निवडणुकांमध्ये भाजपालाही घरचा रस्ता दाखवतील,' अशा स्पष्ट शब्दांमध्ये सिंह यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.  

टॅग्स :kairanaकैरानाBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश