शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"या टीव्हीवाल्यांना शाप लागेल"; तेलंगणाचे मुख्यमंत्री मीडियावर संतापले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 14:25 IST

Telangana CM KC Rao And Corona Virus : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मीडियावर गंभीर आरोप केला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,00,28,709 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,848 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,358 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,90,660 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मीडियावर गंभीर आरोप केला आहे. मीडिया कोरोनाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे असा आरोप केला आहे. तसेच आपण फक्त पॅरासिटामॉल आणि अँटिबायोटिक औषधं खाऊन बरे झालो असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

के. चंद्रशेखर राव (Telangana CM KC Rao) यांना एप्रिलमध्ये कोरोनाची (Corona Virus) लागण झाली होती. फक्त दोन औषधांच्या सेवनाने ते आठवड्याभरात कोरोनातून बरे झाले असा दावा त्यांनी केला आहे  वारंगल येथील्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. "माहीत नाही कोण ब्लॅक फंगस, यलो फंगस अशा आजारांबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. कोणती वाहिनी आहे की कोणता पेपर आहे माहीत नाही. फंगस जिवंत आहे की निर्जीव पण लोक या गोष्टी ऐकून मरत आहेत. मी सांगतो, या टीव्हीवाल्यांना शाप लागेल" असं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. 

आपल्याला कोरोनाची लागण झाली होती त्यावेळचा अनुभव सांगताना राव म्हणाले की, त्यांना डॉक्टरांनी फक्त दोन गोळ्या दिल्या होत्या आणि ते आठवड्याभरात बरे झाले. "मीडिया लोकांना घाबरवत आहेत. अशा प्रकारे विनाकारण भीती पसरवण्याची काय गरज? मीडिया खरी परिस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. कोरोना नसतानाही सरकारी रुग्णालयांमध्ये जागा मिळत होती का? डॉक्टर कधीच रुग्णांना उपचार नाकारत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की गरीब फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार घेऊ शकतात. त्यामुळे ते रुग्णांना जमिनीवरच बसवतात आणि त्यांचे उपचार करतात. मात्र मीडिया काय करते, फोटो काढते आणि सांगते की रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये जमिनीवर झोपायला लागतं" असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"सरकारच्या आकडेवारीपेक्षा कोरोना मृतांची संख्या 43 पट जास्त"; अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी योगी सरकारवर (Yogi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी आता केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सरकारच्या आकडेवारीपेक्षा कोरोना मृतांची संख्या 43 पट जास्त आहे असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. तसेच योगी सरकार मृत्यूंचे आकडे नाही तर स्वत:चं तोंड लपवत आहे अशी बोचरी टीका ही अखिलेश यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "माहितीच्या आधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, असे दिसून आले आहे की, 31 मार्च, 2021 पर्यंत 9 महिन्यांत उत्तर प्रदेशातील 24 जिल्ह्यांमध्ये मृतांची संख्या सरकारच्या आकडेवारीपेक्षा 43 पट जास्त आहे. त्यामुळे भाजपा सरकार मृत्यूची आकडेवारी नव्हे तर आपलं तोंड लपवत आहे" असं अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTelanganaतेलंगणाIndiaभारतMediaमाध्यमेMucormycosisम्युकोरमायकोसिस