शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 01:05 IST

MP Political Crisis: ‘पक्षात राहून जनतेची सेवा करणे अशक्य होत असल्यानेच पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे,’ असे शिंदे यांनी ९ मार्चला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे.

भोपाळ : काठावरचे बहुमत मिळवत साधारण सव्वा वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत राजीनामे दिल्याने कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात गेले आहे. राज्यपालांच्या कार्यालयाने १९ आमदारांचे राजीनामे मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. सरकार अल्पमतात गेल्याने काय पावले उचलायची, यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा झाल्यावर कमलनाथ यांनी सरकारला धोका नसल्याचा दावा केला.

शिंदे लवकरच समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना भाजपतर्फे राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची आणि केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मात्र त्यांचा राजीनामा न स्वीकारता काँग्रेसने पक्षविरोधी कारवायांबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. मोदी, शहा यांची भेट आणि काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर ‘हॅप्पी होली’ एवढीच प्रतिक्रिया देत ज्योतिरादित्य यांनी अधिक बोलणे टाळले. त्यांचे वडील माधवराव शिंदे यांची मंगळवारी पुण्यतिथी होती. त्यानंतर लागोपाठ घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींत बंगळुरू मुक्कामी असलेल्या त्यांच्या समर्थक आमदारांपैकी २२ जणांनी राजीनामे दिले. यात कमलनाथ सरकारमधील सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या ३० पर्यंत जाईल, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. कमलनाथ भाजपचे आमदार फोडतील, या भीतीपोटी रात्री पक्षाने आपल्या सर्व आमदारांना दिल्लीत हलविले.

‘पक्षात राहून जनतेची सेवा करणे अशक्य होत असल्यानेच पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे,’ असे शिंदे यांनी ९ मार्चला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ सिंह यांनी मंगळवारी राज्यपाल लालजी टंडन यांना पत्र लिहून पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या शिंदे यांच्या गटातील इमरती देवी, तुळसी सिलावट, गोविंदसिंग राजपूत, महेंद्रसिंग सिसोदिया, प्रद्युम्नसिंग तोमर आणि प्रभुराम चौधरी अशा सहा मंत्र्यांना त्वरित हटवण्याची मागणी केली आहे.

‘त्या’ आमदारांना पुन्हा संधी?मध्य प्रदेशातील काँगे्रसचे सरकार पाडण्यापेक्षा ते अंतर्गत विरोधामुळे, त्या पक्षातील सत्तासंघर्ष आणि कुरघोडीमुळे कोसळले तर त्याचा ठपका भाजपवर येणार नाही, अशी खेळी भाजप नेत्यांनी खेळली. सध्या २२ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. त्यामुळे सभागृहात बहुमत सिद्ध न करता ते कोसळेल. सध्या राजीनामा दिलेल्या २२ आमदारांना कर्नाटकप्रमाणे पोटनिवडणुकीत पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते.

भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोषकाँग्रेसचे सरकार कोसळणार असल्याचे स्पष्ट होताच मध्य प्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार धुळवड साजरी केली. आता ‘दिवाळी लवकरच’ अशी प्रतिक्रियाही तेथील नेत्यांनी दिली. 

असे आहे सत्तेचे गणित...मध्य प्रदेश विधानसभेतील सदस्यांची संख्या २३० आहे. त्यापैकी दोन आमदारांचे निधन झाले आहे. त्यामुळे ही संख्या २२८ आहे. काँग्रेसकडे ९४ आमदारांचे संख्याबळ होते. छोटे पक्ष- अपक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर ती संख्या ११५ झाली आणि काँग्रेसने सहज बहुमत सिद्ध केले होते. त्यानंतरही सहा आमदारांनी या सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे संख्याबळ १२१ वर पोहोचले. या राज्यात भाजपकडे १०७ आमदार होते.सत्तास्थापनेसाठी त्यांना आठ आमदार कमी पडल्याने त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले. आता काँग्रेसच्या २२ आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्याने विधानसभेतील सदस्यांची संख्या २०६ होईल. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी १०५ आमदारांची गरज आहे. भाजपकडे स्वत:चे १०७ आमदार असल्याने राज्यपालांचे आमंत्रण मिळताच तो पक्ष विधानसभेत सहज बहुमत सिद्ध करू शकेल.वडिलांचाच गिरवला कित्ता : ज्योतिरादित्य यांचे भाजपात स्वागत करत आत्या यशोधराराजे यांनी ही घरवापसी असल्याचे म्हटले. ज्योतिरादित्य यांच्या आजी राजमाता विजयाराजे शिंदे यांनी काँग्रेस सोडून जनसंघाची कास धरली होती, तर वडील माधवराव शिंदे यांनीही काही काळ काँग्रेस सोडून स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडताच त्यांचा मुलगा महाआर्यमान याने मला वडिलांचा अभिमान आहे, असे ट्विट केले आहे.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश