शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

जस्टिन ट्रूडो नरमले? भारताचा उगवता महत्त्वपूर्ण देश असा उल्लेख करत वादाबाबत म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 11:03 IST

India-Canasa Row: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी कट्टरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्द्यावरून महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. कॅनडा भारताला चिथावणी किंवा अडचणीत आणू इच्छित नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी कट्टरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्द्यावरून महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. कॅनडाभारताला चिथावणी किंवा अडचणीत आणू इच्छित नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी भारताला हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आणि सत्य समोर आणण्यासाठी कॅनडाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

भारत आणि कॅनडामध्ये उदभवलेल्या राजनैतिक विवादावरील प्रश्नांना उत्तर देताना ट्रुडो यांनी सांगितले की, आम्ही भारत सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि त्यात पारदर्शकता सुनिश्चित करून, उत्तरदायित्व निश्चित करून, न्याय करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे, असं आवाहन करतो.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७८ व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आलेल्या ट्रुडो यांनी सांगितले की, आम्ही कायद्याचं राज्य असलेला देश आहोत. आम्ही कॅनडातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आमची मूल्ये आणि आंतरराष्ट्रीय नियमाधारित व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक पावलं उचलणं सुरू ठेवू. सध्यातरी आमचं लक्ष त्यावरच आहे. दरम्यान भारताने कॅनडाच्या नागरिकांचा व्हिसा रद्द केल्याच्या कारवाईला प्रतिक्रिया म्हणून कॅनडा सरकारही तशी कारवाई करणार का, असं विचारलं असता ट्रुडो यांनी त्यांचं सरकार भडकवण्याची किंवा कुठलीही समस्या निर्माण करण्याचा विचार करत नसल्याचं सांगितलं. 

यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं महत्त्व वाढत असल्याचंही ट्रूडो यांनी मान्य केलं. ते म्हणाले की, भारताचं महत्त्व वाढत आहे यात कुठलीही शंका नाही. तसेच हा एक असा देश आहे ज्याच्यासोबत काम करत राहण्याची आवश्यकता आहे. हे केवळ प्रादेशिक नाही तर जागतिक पातळीवर आहे. त्यामुळे आम्ही चिथावणी देण्याचा किंवा अडचणी निर्माण करण्याचा विचार करत नाही आहोत. आम्ही कायद्याच्या शासनाच्या महत्त्वाबाबत स्पष्ट आहोत. तसेच कॅनडाच्या लोकांच्या सुरक्षेचंही महत्त्व स्पष्ट आहे. त्यामुळेच आम्ही भारत सरकारला आवाहन करतो की, त्यांनी या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी न्याय आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी आमच्यासोबत काम करावं.

१८ जून रोजी खलिस्तानी कट्टरतावादी हरदीप सिंग निज्जर याच्या झालेल्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा सहभाग असल्याचा आरोप जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला होता. भारताने निज्जर याला २०२० मध्ये दहशतवादी घोषित केले होते. दरम्यान, ट्रूडो यांच्या विधानावर भारताने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.  

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाInternationalआंतरराष्ट्रीय