शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

सरकार पाडण्यासाठी न्यायाधीशांचा हस्तक्षेप, मुख्यमंत्र्यांचे सरन्यायाधीशांना पत्र

By महेश गलांडे | Updated: October 13, 2020 09:34 IST

जगनमोहन यांनी 6 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश बोबडेंना हे पत्र लिहिले असून सोमवारी ते मीडियात आले. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात भूंकप झाला असून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत

ठळक मुद्देजगनमोहन यांनी 6 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश बोबडेंना हे पत्र लिहिले असून सोमवारी ते मीडियात आले. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात भूंकप झाला असून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत

हैदराबाद - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाएसआर जगनमोहन रेड्डी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री रेड्डींनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही. रमन्ना हे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्याशी एकत्र येऊन राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे रेड्डी यांनी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

जगनमोहन यांनी 6 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश बोबडेंना हे पत्र लिहिले असून सोमवारी ते मीडियात आले. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात भूंकप झाला असून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री रेड्डींचे प्रमुख सल्लागार अजेय कल्लम यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. रेड्डींनी सरन्यायाधीशांना 8 पानी पत्र लिहिले असून त्यामध्ये राज्यातील सरकार अस्थीर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी, न्यायाधीश रमन्ना हे चंद्राबाबू यांना मदत करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. उच्च न्यायालयातील कामकाजात ते हस्तक्षेप करत असून न्यायाधीशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं रेड्डी यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, सीएम जगन यांच्या या पत्रामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून राज्यातील राजकारणात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळीही, अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता, पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेवर जाहीरपणे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालयhyderabad-pcहैदराबादChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू