शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

'प्रेमाचे दुकान नसून द्वेषाचा मेगामॉल उघडला'; भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 09:27 IST

मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कामगिरीवर पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.

'भारत जेव्हा जेव्हा नवे विक्रम प्रस्थापित करतो तेव्हा काँग्रेसचे 'युवराज' राहुल गांधी भारताचा अभिमान पचवू शकत नाहीत. एकीकडे ते सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करतात, हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याची चर्चा करतात आणि दुसरीकडे आम्ही प्रेमाचे दुकान चालवत आहोत, असे सांगतात. अहो, तुम्ही द्वेषाचा मेगा शॉपिंग मॉल उघडला आहात, असा टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला. काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कामगिरीवरील एका पुस्तकाचे प्रकाशन केलं. यावेळी ते बोलत होते. 

Odisha Railway Accident : देशभरातील सिग्नल यंत्रणेचं होणार ऑडिट, अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

जेपी नड्डा म्हणाले,'२०१४ पूर्वीचा काळ आणि २०१४ नंतरचा काळ यात खूप फरक आहे. काहीही बदलणार नाही आणि सर्वत्र भ्रष्टाचार होईल, असा लोकांचा विश्वास होता, आम्ही सुधारणार नाही, ही देशाची मानसिकता बनली होती. आपल्या देशाची गणना भ्रष्ट देशांत होत असे. नेतृत्व, हेतू किंवा धोरण नव्हते. लोकांनी भाजपला मतदान केले आणि २०१४ मध्ये भारताला एक नेतृत्व मिळाले जे भारताला पुढे नेत आहे, असंही जेपी नड्डा म्हणाले. 

"एकीकडे विकासाचे नवे विक्रम केले आहेत तर दुसरीकडे वारसा जपला आहे. केदारनाथ ते काशी विश्वनाथ धामपर्यंत नूतनीकरण करण्यात आले. शंकराचार्यजींच्या समाधीची पुनर्बांधणी करण्यात आली आणि प्रार्थनास्थळांची पुनर्बांधणी करण्यात आली,असंही जेपी नड्डा म्हणाले. 

जेपी नड्डा म्हणाले, एक वेळ अशी होती जेव्हा भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी देशाच्या सीमावर्ती गावांमध्ये रस्ते न बांधणे ही देशाची रणनीती असल्याचे सांगितले होते. उलट आज भारताच्या सीमावर्ती गावांचा विकास होत आहे. तेथे रस्ते जोडणी मजबूत केली जात आहेत. 'आर्थिक दृष्टिकोनातून आज भारत ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ऋषी सुनक म्हणतात, तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असंही जेपी नड्डा म्हणाले. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा