शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
6
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
7
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
8
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
9
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
10
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
11
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
12
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
13
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
14
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
15
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
16
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
17
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
18
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
19
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
20
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर

UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 19:45 IST

'पाणी आपले, क्षेत्र आपले, धरणही आपले...पण काँग्रेसला पाकिस्तानच्या नाराजीची भीती.'

JP Nadda in Jammu-Kashmir :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय स्तरावरचे अनेक नेते राज्यात जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी बरनाईमध्ये प्रचारसभेत शाहपूरकंडी प्रकल्पाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

निवडणूक रॅलीला संबोधित करताना नड्डा म्हणाले की, यूपीए सरकारने पाकिस्तान नाराज होईल, या भीतीने शाहपूरकंडी प्रकल्पाला कधीच हात लावला नाही. पाणी आपले, क्षेत्र आपले, धरणही आपले...पण काँग्रेसला पाकिस्तानच्या नाराजीची भीती. देशात मोदी सरकार आल्यानंतर शाहपूरकंडी प्रकल्पाचे काम सुरू झाले आणि आज तो प्रकल्प पूर्णही झाला आहे. या प्रकल्पामुळे जम्मूच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवण्याचे काम केले जात आहे. यामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. 

तीन कुटुंबांनी राज्याचे मोठे नुकसान केलेनड्डा पुढे म्हणतात, व्यापाराच्या नावाखाली एलओसीवरुन दहशतवाद येतो, हे माहीत असूनही काँग्रेस-एनसीने पुन्हा व्यापार सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी प्रमाणपत्र दिले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणतात की, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस भारतात आमचा अजेंडा चालवत आहेत. यावरुन त्यांचे पाकिस्तानप्रेम दिसून येते. या अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरू-गांधी कुटुंबाने काश्मीरचे खूप नुकसान केले. या घराण्यांनी भ्रष्टाचाराच्या सीमा पार केल्या. 1990 चे दिवस पुन्हा यावेत, असे त्यांना वाटते, अशी टीकाही नड्डांनी केली.

'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

ही निवडणूक कोणा एका व्यक्तीची नाहीही निवडणूक जम्मू-काश्मीरच्या स्थैर्याची आणि देशाला बळकट करण्यासाठी आहे. त्यामुळे देशाला कमकुवत करणाऱ्या शक्तींना आपण चोख प्रत्युत्तर देऊ. काँग्रेस सत्तेत असताना जातिवाद, जातीयवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण, फूट पाडा आणि राज्य करा असे मुद्दे गाजत होते. पंतप्रधान मोदींनी राजकारणाची संस्कृती आणि व्याख्या बदलून टाकली आहे. 2014 मध्ये जेव्हा मोदीजींनी पदभार स्वीकारला तेव्हा ते लोकाभिमुख राजकारण, जबाबदार प्रशासन, प्रतिसादात्मक सरकार आणि कामगिरीवर आधारित राजकारणाची सुरुवात झाली.

राज्यात G20चे आयोजनजम्मू-काश्मीरमध्ये G20 चे आयोजन करण्यात आले होते, जगभरातून नेते राज्यात आले. यापूर्वी असा कार्यक्रम झाला असता तर तो फक्त दिल्लीपुरता मर्यादित राहिला असता, पण मोदीजींनी G20 ला राष्ट्रीय कार्यक्रम बनवले. श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र G20 बैठका झाल्या आणि जगभरातून लोक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, असेही जेपी नड्डा यावेळी म्हणाले.

जेपी नड्डांची आश्वासनेराज्यात आमचे सरकार आल्यावर पीएम-किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारी 6,000 रुपयांची वार्षिक मदत 10,000 रुपये केली जाईल. पंडित प्रेमनाथ डोगरा योजनेंतर्गत आम्ही 5 लाख तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहोत. भूमिहीनांना अटल आवास योजनेंतर्गत 5 मरला जमीन मोफत दिली जाणार आहे. राज्यातील मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन नड्डांनी यावेळी दिले.

शाहपूरकंडी प्रकल्प काय आहे?शाहपूरकंडी धरण प्रकल्प भारताच्या पंजाब राज्यातील पठाणकोट जिल्ह्यातील रावी नदीवर आहे. शाहपूरकंडी धरणाच्या उभारणीसाठी पंजाब आणि जम्मू-काश्मीर यांच्यात जानेवारी 1979 मध्ये द्विपक्षीय करार झाला, पण प्रस्तावित प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही. या प्रकल्पाची पायाभरणी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन 1982 मध्ये केली होती, मात्र यूपीए सरकारच्या काळात हे धरण बांधता आले नाही. या धरणाचे काम मोदी सरकारच्या काळात (2018) सुरू झाले आणि आता ते पूर्ण झाले आहे.

 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाcongressकाँग्रेस