शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 19:45 IST

'पाणी आपले, क्षेत्र आपले, धरणही आपले...पण काँग्रेसला पाकिस्तानच्या नाराजीची भीती.'

JP Nadda in Jammu-Kashmir :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय स्तरावरचे अनेक नेते राज्यात जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी बरनाईमध्ये प्रचारसभेत शाहपूरकंडी प्रकल्पाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

निवडणूक रॅलीला संबोधित करताना नड्डा म्हणाले की, यूपीए सरकारने पाकिस्तान नाराज होईल, या भीतीने शाहपूरकंडी प्रकल्पाला कधीच हात लावला नाही. पाणी आपले, क्षेत्र आपले, धरणही आपले...पण काँग्रेसला पाकिस्तानच्या नाराजीची भीती. देशात मोदी सरकार आल्यानंतर शाहपूरकंडी प्रकल्पाचे काम सुरू झाले आणि आज तो प्रकल्प पूर्णही झाला आहे. या प्रकल्पामुळे जम्मूच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवण्याचे काम केले जात आहे. यामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. 

तीन कुटुंबांनी राज्याचे मोठे नुकसान केलेनड्डा पुढे म्हणतात, व्यापाराच्या नावाखाली एलओसीवरुन दहशतवाद येतो, हे माहीत असूनही काँग्रेस-एनसीने पुन्हा व्यापार सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी प्रमाणपत्र दिले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणतात की, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस भारतात आमचा अजेंडा चालवत आहेत. यावरुन त्यांचे पाकिस्तानप्रेम दिसून येते. या अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरू-गांधी कुटुंबाने काश्मीरचे खूप नुकसान केले. या घराण्यांनी भ्रष्टाचाराच्या सीमा पार केल्या. 1990 चे दिवस पुन्हा यावेत, असे त्यांना वाटते, अशी टीकाही नड्डांनी केली.

'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

ही निवडणूक कोणा एका व्यक्तीची नाहीही निवडणूक जम्मू-काश्मीरच्या स्थैर्याची आणि देशाला बळकट करण्यासाठी आहे. त्यामुळे देशाला कमकुवत करणाऱ्या शक्तींना आपण चोख प्रत्युत्तर देऊ. काँग्रेस सत्तेत असताना जातिवाद, जातीयवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण, फूट पाडा आणि राज्य करा असे मुद्दे गाजत होते. पंतप्रधान मोदींनी राजकारणाची संस्कृती आणि व्याख्या बदलून टाकली आहे. 2014 मध्ये जेव्हा मोदीजींनी पदभार स्वीकारला तेव्हा ते लोकाभिमुख राजकारण, जबाबदार प्रशासन, प्रतिसादात्मक सरकार आणि कामगिरीवर आधारित राजकारणाची सुरुवात झाली.

राज्यात G20चे आयोजनजम्मू-काश्मीरमध्ये G20 चे आयोजन करण्यात आले होते, जगभरातून नेते राज्यात आले. यापूर्वी असा कार्यक्रम झाला असता तर तो फक्त दिल्लीपुरता मर्यादित राहिला असता, पण मोदीजींनी G20 ला राष्ट्रीय कार्यक्रम बनवले. श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र G20 बैठका झाल्या आणि जगभरातून लोक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, असेही जेपी नड्डा यावेळी म्हणाले.

जेपी नड्डांची आश्वासनेराज्यात आमचे सरकार आल्यावर पीएम-किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारी 6,000 रुपयांची वार्षिक मदत 10,000 रुपये केली जाईल. पंडित प्रेमनाथ डोगरा योजनेंतर्गत आम्ही 5 लाख तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहोत. भूमिहीनांना अटल आवास योजनेंतर्गत 5 मरला जमीन मोफत दिली जाणार आहे. राज्यातील मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन नड्डांनी यावेळी दिले.

शाहपूरकंडी प्रकल्प काय आहे?शाहपूरकंडी धरण प्रकल्प भारताच्या पंजाब राज्यातील पठाणकोट जिल्ह्यातील रावी नदीवर आहे. शाहपूरकंडी धरणाच्या उभारणीसाठी पंजाब आणि जम्मू-काश्मीर यांच्यात जानेवारी 1979 मध्ये द्विपक्षीय करार झाला, पण प्रस्तावित प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही. या प्रकल्पाची पायाभरणी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन 1982 मध्ये केली होती, मात्र यूपीए सरकारच्या काळात हे धरण बांधता आले नाही. या धरणाचे काम मोदी सरकारच्या काळात (2018) सुरू झाले आणि आता ते पूर्ण झाले आहे.

 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाcongressकाँग्रेस