शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 19:45 IST

'पाणी आपले, क्षेत्र आपले, धरणही आपले...पण काँग्रेसला पाकिस्तानच्या नाराजीची भीती.'

JP Nadda in Jammu-Kashmir :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय स्तरावरचे अनेक नेते राज्यात जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी बरनाईमध्ये प्रचारसभेत शाहपूरकंडी प्रकल्पाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

निवडणूक रॅलीला संबोधित करताना नड्डा म्हणाले की, यूपीए सरकारने पाकिस्तान नाराज होईल, या भीतीने शाहपूरकंडी प्रकल्पाला कधीच हात लावला नाही. पाणी आपले, क्षेत्र आपले, धरणही आपले...पण काँग्रेसला पाकिस्तानच्या नाराजीची भीती. देशात मोदी सरकार आल्यानंतर शाहपूरकंडी प्रकल्पाचे काम सुरू झाले आणि आज तो प्रकल्प पूर्णही झाला आहे. या प्रकल्पामुळे जम्मूच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवण्याचे काम केले जात आहे. यामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. 

तीन कुटुंबांनी राज्याचे मोठे नुकसान केलेनड्डा पुढे म्हणतात, व्यापाराच्या नावाखाली एलओसीवरुन दहशतवाद येतो, हे माहीत असूनही काँग्रेस-एनसीने पुन्हा व्यापार सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी प्रमाणपत्र दिले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणतात की, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस भारतात आमचा अजेंडा चालवत आहेत. यावरुन त्यांचे पाकिस्तानप्रेम दिसून येते. या अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरू-गांधी कुटुंबाने काश्मीरचे खूप नुकसान केले. या घराण्यांनी भ्रष्टाचाराच्या सीमा पार केल्या. 1990 चे दिवस पुन्हा यावेत, असे त्यांना वाटते, अशी टीकाही नड्डांनी केली.

'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

ही निवडणूक कोणा एका व्यक्तीची नाहीही निवडणूक जम्मू-काश्मीरच्या स्थैर्याची आणि देशाला बळकट करण्यासाठी आहे. त्यामुळे देशाला कमकुवत करणाऱ्या शक्तींना आपण चोख प्रत्युत्तर देऊ. काँग्रेस सत्तेत असताना जातिवाद, जातीयवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण, फूट पाडा आणि राज्य करा असे मुद्दे गाजत होते. पंतप्रधान मोदींनी राजकारणाची संस्कृती आणि व्याख्या बदलून टाकली आहे. 2014 मध्ये जेव्हा मोदीजींनी पदभार स्वीकारला तेव्हा ते लोकाभिमुख राजकारण, जबाबदार प्रशासन, प्रतिसादात्मक सरकार आणि कामगिरीवर आधारित राजकारणाची सुरुवात झाली.

राज्यात G20चे आयोजनजम्मू-काश्मीरमध्ये G20 चे आयोजन करण्यात आले होते, जगभरातून नेते राज्यात आले. यापूर्वी असा कार्यक्रम झाला असता तर तो फक्त दिल्लीपुरता मर्यादित राहिला असता, पण मोदीजींनी G20 ला राष्ट्रीय कार्यक्रम बनवले. श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र G20 बैठका झाल्या आणि जगभरातून लोक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, असेही जेपी नड्डा यावेळी म्हणाले.

जेपी नड्डांची आश्वासनेराज्यात आमचे सरकार आल्यावर पीएम-किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारी 6,000 रुपयांची वार्षिक मदत 10,000 रुपये केली जाईल. पंडित प्रेमनाथ डोगरा योजनेंतर्गत आम्ही 5 लाख तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहोत. भूमिहीनांना अटल आवास योजनेंतर्गत 5 मरला जमीन मोफत दिली जाणार आहे. राज्यातील मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन नड्डांनी यावेळी दिले.

शाहपूरकंडी प्रकल्प काय आहे?शाहपूरकंडी धरण प्रकल्प भारताच्या पंजाब राज्यातील पठाणकोट जिल्ह्यातील रावी नदीवर आहे. शाहपूरकंडी धरणाच्या उभारणीसाठी पंजाब आणि जम्मू-काश्मीर यांच्यात जानेवारी 1979 मध्ये द्विपक्षीय करार झाला, पण प्रस्तावित प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही. या प्रकल्पाची पायाभरणी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन 1982 मध्ये केली होती, मात्र यूपीए सरकारच्या काळात हे धरण बांधता आले नाही. या धरणाचे काम मोदी सरकारच्या काळात (2018) सुरू झाले आणि आता ते पूर्ण झाले आहे.

 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाcongressकाँग्रेस