शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
5
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
6
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
7
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
8
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
9
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
10
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
11
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
12
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
13
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
14
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
15
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
16
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
18
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
19
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
20
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद

बेटा अज्जू, चाय पिला दे....; मृत आजी अचानक बोलू लागली; सगळ्यांची उडाली घाबरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 18:00 IST

एका परिवाराने घरातील वयोवृद्ध महिलेच्या शरीराची काहीच हालचाल होत नसल्याने तिला मृत मानलं. सर्व नातेवाईकांना याची माहिती देत बोलवूनही घेतलं. पण नियतीला वेगळंच काहीतरी मंजूर होतं. 

कोरोना काळात वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक अविश्वसनीय घटना समोर येत आहेत. मृतदेह अंत्यसंस्कारावेळी जिवंत झाल्याच्या कितीतरी घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना जोधपूर राजस्थानच्या भदवासिया गावातून समोर आली आहे. येथील एका परिवाराने घरातील वयोवृद्ध महिलेच्या शरीराची काहीच हालचाल होत नसल्याने तिला मृत मानलं. सर्व नातेवाईकांना याची माहिती देत बोलवूनही घेतलं. पण नियतीला वेगळंच काहीतरी मंजूर होतं. 

सगळे लोक सकाळ होण्याची होण्याची वाट बघत होते. अशात दोन तासांनंतर मृत समजण्यात आलेल्या वयोवृद्ध महिलेने अचानक डोळे उघडले आणि म्हणाली - 'अज्जू मला चहा दे'. हे ऐकताच परिवारातील सगळे लोक हैराण झाले. त्यांनी डोळे उघडले आणि पुन्हा बंद केलेत. मात्र, श्वास सुरू होता आणि पल्सची चालू होती.

त्यानंतर परिवारातील लोक त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी ५ वर्षीय इंद्रा देवी यांना तपासलं आणि मृत घोषित केलं. निराश झालेले कुटुंबीय त्यांना पुन्हा घरी घेऊन आले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. (हे पण वाचा : हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजणाऱ्या आईसाठी मुलानं केलं असं काही, डॉक्टर-नर्सेसनाही कोसळलं रडू)

काय आहे पूर्ण घटना

राजस्थान हायकोर्टात काम करणारे हेमंत सोलंकी यांनी सांगितले की, त्यांच्या आईला २ दिवसांआधी पेरलेटिक अटॅक आला होता. पण २ दिवसानंतर त्यांची तब्येत चांगली सुधारली. बुधवारी सकाळी ४ वाजता त्या उठल्या आणि टॉयलेटला गेल्या. तेव्हा त्या अचानक पडल्या. नंतर त्यांना बाहेर आणून बेडवर ठेवण्यात आलं. पण त्यांच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांना सर्व नातेवाईकांना बोलवून घेतलं. (हे पण वाचा : १० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ)

अचानक आईने मागितला चहा

हेमंत यांचे जे नातेवाईक आले त्यांनीही पाहिलं की, आईचं शरीर थंड पडलं आहे. श्वास बंद झाला होता आणि पल्सही सुरू नव्हती. हेमंतच्या नातेवाईकांनीही आईला मृत समजून बेडवरून खाली ठेवलं. साधारण ६ वाजत अचानक हेमंतच्या आईने डोळे उघडले आणि म्हणाली 'अज्जू चाय पिला दे'. यावर सगळेच थक्क झाले. ते लगेच आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण डॉक्टरांनी तिथे गेल्यावर त्यांना मृत घोषित केले.

हेमंत सोलंकी म्हणाले की, २ तासांपर्यंत आईच्या शरीरात काहीच हालचाल नसल्यावर आईने अचानक आवाज दिल्याने त्यांना वाटलं आई परत आहे. आपल्या सोबत राहणार आहे. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

टॅग्स :Rajasthanराजस्थानDeathमृत्यू