शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

'भारतात नोकऱ्यांचा दुष्काळ; पुरेशा विकासाचा अभाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 06:21 IST

अर्थव्यवस्था कमकुवत : १० टक्क्यांहून अधिक विकास दराची गरज

नवी दिल्ली : डिजिटायझेशनमुळे बँकिंग व वित्त सेवा क्षेत्रात चांगल्या नोकºया निर्माण होण्याचा अंदाज असला तरी, वास्तवात देशात नोकºयांचा दुष्काळ आहे. मुबलक नोकºया देण्याइतक्या विकास भारतात झालेला नाही. बँकिंग क्षेत्राची नाजूक स्थिती, थंडावलेल्या आर्थिक सुधारणा या कारणांमुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. नोकºयांचा दुष्काळ दूर करण्यासाठी भारताला १० टक्क्यांहून अधिक आर्थिक विकस दराची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारताचा आर्थिक विकास दर (जीडीपी) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ८.२ टक्के असल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा दर पुरेसा नाही. चीनच्या तुलनेत भारत अद्याप खूप मागे आहे. भारतातील १.२० कोटी तरुणांना रोजगार मिळण्यासाठी कामगार कायद्यात आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, असे गोल्डमॅन सॅच्स अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे माजी प्रमुख जीम ओ नेल यांनी सांगितले. रेल्वेने अलीकडे ९० हजार जागा भरण्याची घोषणा करताच २.८० कोटी युवकांचे अर्ज आले होते. यावरूनच नोकºयांची भीषणता स्पष्ट होते, असे ओ नेल यांचे म्हणणे आहे.

जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ एजाझ घनी यांच्यानुसार, भारतातील उत्पादन व तांत्रिक विकास मर्यादित आहे. त्याचा फटका रोजगारनिर्मितीला बसत आहे. डिजिटायझेनमुळे कौशल्यावर आधारित नोकºया तयार होत आहेत. पण कौशल्याचा अभाव असलेल्या कामगारांना नोकºया गमवाव्या लागत आहेत. नोकºयांच्या अभावामुळे ‘गुंतवणुकीचे केंद्र’ म्हणून असलेली भारताची आंतरराष्टÑीय प्रतिमा मलिन होत आहे. ती बदलण्यासाठी केंद्र सरकारने कसोशीने प्रयत्न करण्याची गरज आहे.नोकऱ्यांबाबत निश्चित ‘डेटा’च नाहीदरवर्षी १ कोटी रोजगारनिर्मितीचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी २०१४ मध्ये दिले होते. पण गेल्या चार वर्षांत मिळूनही इतक्या नोकºया निर्माण झालेल्या नाहीत. भविष्य निर्वाह निधी संघटनेने नोकºयांचा डेटा जाहीर केला. त्याद्वारे देशात नोकºया वाढल्याचे चित्र उभे करण्यात आले. वास्तवात नोकºया किंवा बेरोजगारीचे इत्थंभूत प्रमाण सांगणारा कुठलाही निश्चित डेटा भारतात उपलब्ध नाही. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य सरकारच्या ध्यानात आलेले नाही, असे तज्ज्ञ सांगतात. 

टॅग्स :jobनोकरीIndiaभारतEmployeeकर्मचारी