शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

जम्मू-काश्मीरच्या सचिवालयावर आता डौलानं फडकणार फक्त भारताचा तिरंगा; 'लाल झेंडा' इतिहासजमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 17:09 IST

श्रीनगरच्या सचिवालयावर आज फक्त भारताचा तिरंगा डौलानं फडकताना दिसतोय.

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरच्या सचिवालयावर आज फक्त भारताचा तिरंगा डौलानं फडकताना दिसतोय. आता जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय ध्वज म्हणून भारताचा तिरंगाच पाहायला मिळणार आहे. इंडिया टुडेशी बोलताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जम्मू-काश्मीरमधल्या सर्वच सरकारी कार्यालयांवर तिरंगा लावण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात तिथे दोन झेंडे फडकत होते. कलम 370 हटविल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की, जम्मू काश्मीरमध्ये आता वेगळा झेंडा फडकणार नाही, तसेच येथील लोकांसाठी दुहेरी नागरिकत्व राहणार नाही. जम्मू-काश्मीरचं पुनर्रचना विधेयक आणून लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आला आहे. तसेच अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीर येथेही दर 5 वर्षांनी विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारनं तिथे सुरक्षेच्या कारणास्तव 35 हजारांहून अधिक सुरक्षा जवान काश्मीर खोऱ्यात तैनात केले आहेत. कलम 370 हटवल्यानंतर तीन आठवड्यांनी जमावबंदी काढून टाकण्यात आली आहे. रस्त्यावर पहिल्यासारखीच लोकांची ये-जा सुरू झाली असून, विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत आणि कॉलेजला जात आहेत. सरकारी कार्यालयातही सुरळीत कामकाज सुरू झाले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर