शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या सचिवालयावर आता डौलानं फडकणार फक्त भारताचा तिरंगा; 'लाल झेंडा' इतिहासजमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 17:09 IST

श्रीनगरच्या सचिवालयावर आज फक्त भारताचा तिरंगा डौलानं फडकताना दिसतोय.

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरच्या सचिवालयावर आज फक्त भारताचा तिरंगा डौलानं फडकताना दिसतोय. आता जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय ध्वज म्हणून भारताचा तिरंगाच पाहायला मिळणार आहे. इंडिया टुडेशी बोलताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जम्मू-काश्मीरमधल्या सर्वच सरकारी कार्यालयांवर तिरंगा लावण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात तिथे दोन झेंडे फडकत होते. कलम 370 हटविल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की, जम्मू काश्मीरमध्ये आता वेगळा झेंडा फडकणार नाही, तसेच येथील लोकांसाठी दुहेरी नागरिकत्व राहणार नाही. जम्मू-काश्मीरचं पुनर्रचना विधेयक आणून लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आला आहे. तसेच अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीर येथेही दर 5 वर्षांनी विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारनं तिथे सुरक्षेच्या कारणास्तव 35 हजारांहून अधिक सुरक्षा जवान काश्मीर खोऱ्यात तैनात केले आहेत. कलम 370 हटवल्यानंतर तीन आठवड्यांनी जमावबंदी काढून टाकण्यात आली आहे. रस्त्यावर पहिल्यासारखीच लोकांची ये-जा सुरू झाली असून, विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत आणि कॉलेजला जात आहेत. सरकारी कार्यालयातही सुरळीत कामकाज सुरू झाले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर