शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

फाइव्ह-जीच्या स्पर्धेत जिओने घेतली उडी; स्पेक्ट्रमची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 23:06 IST

ह्युवेईला कंत्राट नाकारल्यानंतर लगेचच देणार जागतिक कंपन्यांना टक्कर

नवी दिल्ली : जगभरामध्ये उत्सुकतेचा विषय असलेल्या ५ जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये रिलायन्सच्याजिओने उडी घेतली असून, पहिली भारतीय कंपनी बनण्याचा बहुमानही पटकावला आहे. निवडक महानगरांमध्ये आपल्या ५ जी नेटवर्कची चाचणी करण्यासाठी स्पेक्ट्रमची मागणी रिलायन्सजिओने नोंदविली आहे. दूरसंचार विभागाकडे हा अर्ज करण्यात आला असून, दोन्ही बॅण्डवर आपल्याला स्पेक्ट्रम मिळावेत, अशी विनंतीही कंपनीने दूरसंचार विभागाला केली आहे.

चीनबरोबर संघर्षात्मक स्थिती निर्माण झाल्यावर चीनच्या ह्युवेई कंपनीला ५ जीचे कंत्राट नाकारण्यात आल्याने भारतामध्ये ही सेवा सुरू होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला जिओने तत्काळ उत्तर दिल्याने नागरिक या सेवेसाठी आतूर झाले आहेत.

जिओने दूरसंचार विभागाकडे केलेल्या अर्जामध्ये आपल्याला एमएम वेव्हच्या दोन्ही बॅण्ड्सवर प्रत्येकी ८०० मेगाहर्ट्झचे स्पेक्ट्रम देण्याची मागणी केली आहे. या माध्यमातून कंपनी आपणच विकसित केलेल्या संपूर्ण देशी बनावटीच्या ५ जी तंत्रज्ञानाची चाचणी घेणार आहे. जगात निवडक देशांतच ५ जी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यात भारत समाविष्ट होणार असल्याने ही आनंदाची बाब आहे.

रिलायन्सच्या वार्षिक सभेमध्ये केली होती घोषणा

च्रिलायन्स इंडस्ट्रिजच्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओने स्वत:चे५ जी तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा केली होती.

च्संपूर्ण स्वदेशी असलेल्या या तंत्रज्ञानामध्ये आपले ४ जी नेटवर्क हे सहजपणे ५ जीमध्ये बदलणे शक्य होणार असल्याचे रिलायन्सचे म्हणणे आहे. यामुळे जिओ स्वत: ५ जी तंत्रज्ञान विकसित केलेल्या कंपन्यांमध्ये समाविष्ट होणार आहे. पुढील वर्षी भारतात ५ जी सेवेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Relianceरिलायन्सJioजिओIndiaभारत