शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत मोहम्मद अली जिनांचा आलिशान बंगला; आता मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:27 IST

Jinnah House: पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात 1936 साली स्वतःसाठी हा बंगला बांधला होता.

Jinnah House: पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात 1936 साली स्वतःसाठी 'साउथ कोर्ट' नावाचा एक आलिशान बंगला बांधला होता. भारताच्या विभाजनानंतर जिना पाकिस्तानात गेले अन् त्यांचा हा बंगला भारत सरकारच्या ताब्यात आला. आता सरकारने या बंगल्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच या बंगल्याचे नूतनीकरण केले जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या नुतणीकरणाच्या कामासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) अंतिम मंजुरीची वाट पाहत आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाला या बंगल्याला एक विशेष राजनैतिक एन्क्लेव्ह बनवायचे आहे.

मुंबई हेरिटेज कंझर्वेशन कमिटी (MHCC) ने ऑगस्ट 2023 मध्ये या हेरिटेज साइटच्या नूतनीकरणाला मान्यता दिली. परराष्ट्र मंत्रालयाने हे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) कडे सोपवले असून, त्यांनी या प्रकल्पासाठी सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. 

मनोरंजक गोष्ट म्हणजे, मोहम्मद अली जिनांचे हे आर्ट डेको शैलीतील घर क्लॉड बॅटली यांनी डिझाइन केले होते. बॅटली त्यावेळी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख होते.

2018 साली परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवलेपंतप्रधान कार्यालयाने 2018 मध्ये 'जिना हाऊस' म्हणून प्रसिद्ध असलेला हा बंगला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) कडून परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी सांगितले होते की, परराष्ट्र मंत्रालय दिल्लीतील हैदराबाद हाऊसप्रमाणे या बंगल्याची दुरुस्ती आणि सजावट करेल.

जिना हाऊसमध्ये अनेक अंतर्गत बदल होणारमीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी (MHCC) कडे सादर केलेल्या प्रस्तावात जिना हाऊस बंगल्याचे निवासी जागेतून कार्यालयात रूपांतर केले जाईल आणि त्यामध्ये आवश्यक दुरुस्ती, बदल केले जातील. कागदपत्रांनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अद्याप बंगल्याच्या कोणत्याही भागात कोणतेही बदल केलेले नाहीत किंवा पुढील बांधकाम करण्याची विनंती केलेली नाही. परंतु असे म्हटले जाते की भारताची ओळख, इतिहास आणि संस्कृती दर्शविण्यासाठी आत काही सौंदर्यात्मक बदल केले जाऊ शकतात.

 

टॅग्स :MumbaiमुंबईPakistanपाकिस्तानIndiaभारतBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार