शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

मुंबईत मोहम्मद अली जिनांचा आलिशान बंगला; आता मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:27 IST

Jinnah House: पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात 1936 साली स्वतःसाठी हा बंगला बांधला होता.

Jinnah House: पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात 1936 साली स्वतःसाठी 'साउथ कोर्ट' नावाचा एक आलिशान बंगला बांधला होता. भारताच्या विभाजनानंतर जिना पाकिस्तानात गेले अन् त्यांचा हा बंगला भारत सरकारच्या ताब्यात आला. आता सरकारने या बंगल्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच या बंगल्याचे नूतनीकरण केले जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या नुतणीकरणाच्या कामासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) अंतिम मंजुरीची वाट पाहत आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाला या बंगल्याला एक विशेष राजनैतिक एन्क्लेव्ह बनवायचे आहे.

मुंबई हेरिटेज कंझर्वेशन कमिटी (MHCC) ने ऑगस्ट 2023 मध्ये या हेरिटेज साइटच्या नूतनीकरणाला मान्यता दिली. परराष्ट्र मंत्रालयाने हे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) कडे सोपवले असून, त्यांनी या प्रकल्पासाठी सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. 

मनोरंजक गोष्ट म्हणजे, मोहम्मद अली जिनांचे हे आर्ट डेको शैलीतील घर क्लॉड बॅटली यांनी डिझाइन केले होते. बॅटली त्यावेळी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख होते.

2018 साली परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवलेपंतप्रधान कार्यालयाने 2018 मध्ये 'जिना हाऊस' म्हणून प्रसिद्ध असलेला हा बंगला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) कडून परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी सांगितले होते की, परराष्ट्र मंत्रालय दिल्लीतील हैदराबाद हाऊसप्रमाणे या बंगल्याची दुरुस्ती आणि सजावट करेल.

जिना हाऊसमध्ये अनेक अंतर्गत बदल होणारमीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी (MHCC) कडे सादर केलेल्या प्रस्तावात जिना हाऊस बंगल्याचे निवासी जागेतून कार्यालयात रूपांतर केले जाईल आणि त्यामध्ये आवश्यक दुरुस्ती, बदल केले जातील. कागदपत्रांनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अद्याप बंगल्याच्या कोणत्याही भागात कोणतेही बदल केलेले नाहीत किंवा पुढील बांधकाम करण्याची विनंती केलेली नाही. परंतु असे म्हटले जाते की भारताची ओळख, इतिहास आणि संस्कृती दर्शविण्यासाठी आत काही सौंदर्यात्मक बदल केले जाऊ शकतात.

 

टॅग्स :MumbaiमुंबईPakistanपाकिस्तानIndiaभारतBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार