शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

मुंबईत मोहम्मद अली जिनांचा आलिशान बंगला; आता मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:27 IST

Jinnah House: पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात 1936 साली स्वतःसाठी हा बंगला बांधला होता.

Jinnah House: पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात 1936 साली स्वतःसाठी 'साउथ कोर्ट' नावाचा एक आलिशान बंगला बांधला होता. भारताच्या विभाजनानंतर जिना पाकिस्तानात गेले अन् त्यांचा हा बंगला भारत सरकारच्या ताब्यात आला. आता सरकारने या बंगल्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच या बंगल्याचे नूतनीकरण केले जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या नुतणीकरणाच्या कामासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) अंतिम मंजुरीची वाट पाहत आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाला या बंगल्याला एक विशेष राजनैतिक एन्क्लेव्ह बनवायचे आहे.

मुंबई हेरिटेज कंझर्वेशन कमिटी (MHCC) ने ऑगस्ट 2023 मध्ये या हेरिटेज साइटच्या नूतनीकरणाला मान्यता दिली. परराष्ट्र मंत्रालयाने हे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) कडे सोपवले असून, त्यांनी या प्रकल्पासाठी सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. 

मनोरंजक गोष्ट म्हणजे, मोहम्मद अली जिनांचे हे आर्ट डेको शैलीतील घर क्लॉड बॅटली यांनी डिझाइन केले होते. बॅटली त्यावेळी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख होते.

2018 साली परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवलेपंतप्रधान कार्यालयाने 2018 मध्ये 'जिना हाऊस' म्हणून प्रसिद्ध असलेला हा बंगला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) कडून परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी सांगितले होते की, परराष्ट्र मंत्रालय दिल्लीतील हैदराबाद हाऊसप्रमाणे या बंगल्याची दुरुस्ती आणि सजावट करेल.

जिना हाऊसमध्ये अनेक अंतर्गत बदल होणारमीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी (MHCC) कडे सादर केलेल्या प्रस्तावात जिना हाऊस बंगल्याचे निवासी जागेतून कार्यालयात रूपांतर केले जाईल आणि त्यामध्ये आवश्यक दुरुस्ती, बदल केले जातील. कागदपत्रांनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अद्याप बंगल्याच्या कोणत्याही भागात कोणतेही बदल केलेले नाहीत किंवा पुढील बांधकाम करण्याची विनंती केलेली नाही. परंतु असे म्हटले जाते की भारताची ओळख, इतिहास आणि संस्कृती दर्शविण्यासाठी आत काही सौंदर्यात्मक बदल केले जाऊ शकतात.

 

टॅग्स :MumbaiमुंबईPakistanपाकिस्तानIndiaभारतBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार