शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Farmers Protest : ...म्हणून शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलं स्वत:च्या रक्ताने लिहिलेलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 16:10 IST

Farmers Protest And PM Narendra Modi : आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक वेळा बैठक झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक वेळा बैठक झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आंदोलक शेतकरी सरकारचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान काही आंदोलक शेतकर्‍यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिल्याची घटना समोर आली आहे. तसेच या पत्राद्वारे संबंधित कायदे मागे घेण्याची आणि एमएसपी (MSP) लागू करण्याची मागणी केली आहे.

जींद येथील टोल नाक्याजवळ केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या शेकडो शेतकर्‍यांनी इंजेक्शनद्वारे रक्त काढून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. यावेळी शेतकऱ्यांनी 'हे काळे कायदे आम्हाला नको आहेत, त्याऐवजी सरकारने एमएसपीवर कायमस्वरूपी कायदे केले पाहिजेत' अशी मागणी त्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील जींद जिल्ह्यातील आंदोलक शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना रक्ताने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आम्हाला हे तीनही काळे कायदे नको आहेत. हे तीन काळे कायदे परत घ्या आणि एमएसपीवर कायमस्वरुपी कायदा करा."

"जींद टोल प्लाझा येथे आंदोलन करणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की, गेल्या 63 दिवसांहून अधिक काळ आम्ही कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. असं असलं तरी अद्याप कोणतीही सुनावणी झालेली नाही" त्यामुळेच तरुण शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने पंतप्रधानांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. रक्ताने पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, जे शेतकरी गांधीवादी पद्धतीनं आंदोलन करत आहेत. त्या शेतकऱ्यांना भगतसिंगांसारखं रक्तही देता येतं.

महिला शेतकरी सिक्कम, शेतकरी नेते विजेंदर सिंधू यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशासह देशातील अनेक राज्यातील शेतकरी केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. हे कायदे कोणत्याही परिस्थितीत मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. शेतकरी आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओला (Reliance Jio) बसला आहे. रिलायन्स जिओला शेतकरी आंदोलनामुळेपंजाब आणि हरियाणात नुकसान सहन करावं लागलं आहे.

शेतकरी आंदोलनाचा फटका! Reliance Jio चं झालं मोठं नुकसान; युजर्सच्या संख्येत घट

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. ट्रायने दिलेल्या डेटानुसार, डिसेंबर 2020 मध्ये फक्त पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांत रिलायन्स जिओच्या ग्राहक संख्येत मोठी घट झाली आहे. शेतकरी आंदोलनाची देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओलाही झळ बसली आहे. कंपनीच्या पंजाब व हरयाणातील ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये पंजाबमध्ये जिओचे 1.40 कोटी युजर्स होते. तर डिसेंबरच्या शेवटी ही संख्या 1.25 कोटींवर येऊन पोहोचली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीHaryanaहरयाणा