शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

जिहादी अजेंडा चालवणारे सेक्युलॅरिझमच्या कातडीखाली लपतात, सरपंचांच्या हत्येवरून कंगनाचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 23:34 IST

दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित व्यक्तीची हत्या केल्याने काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 नवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या काश्मिरी पंडित सरपंच अजय पंडिता यांच्या हत्येनंतर काश्मीरमधील वातावरण तापले आहे. तसेच दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित व्यक्तीची हत्या केल्याने काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, रोखठोक मत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कंगना राणौत हिनेही या प्रकरणात प्रतिक्रिया देताना अजय पंडिता यांच्या हत्येबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून बॉलिवूडवरसुद्धा जोरदार टीका केली आहे. काश्मिरी पंडित असलेल्या अजय पंडिता यांच्या हत्येबाबत बॉलीवूडने पाळलेल्या मौनावर कंगनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेक्युलँरिझमचे धडे शिकवणारे आता गप्प बसले आहेत, असे सांगत कंगनाने बॉलिवूडच्या सिलेक्टिव्ह भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. काही अभिनेते मेणबत्त्या आणि पेट्रोल बॉम्ब घेऊन देशाला जाळण्यासाठी रस्त्यावर उतरतात. मात्र अशा.मुद्द्यावर मौन पाळतात. 

दरम्यान, काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात परतता आले पाहिजे, त्यांना त्यांची भूमी पुन्हा मिळाली पाहिजे.  तसेच काश्मीर खोऱ्यात पुन्हा हिंदू धर्माची स्थापना झाली पाहिजे, अशी मागणी कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. 

दरम्यान, माझे वडील आयुष्यात कुणाला घाबरले नाहीत. ना मी कुणाला घाबरते, अशा शब्दात अजय पंडिता यांच्या मुलीने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच तिने शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अजय पंडिता यांची कन्या शीन पंडिता म्हणाली की, 'माझ्या वडिलांनी संरक्षण मागितले होते. काश्मीरसारख्या प्रदेशात  सरपंच बनल्यानंतर त्यांना संरक्षण मिळणे आवश्यक होते. मात्र जी गोष्ट त्यांना मिळणायला हवी होती ती त्यांना मागावी लागली. मात्र तरीही त्यांना संरक्षण मिळाले नाही, अशा शब्दांत तिने स्थानिक शासन, प्रशासन यंत्रणेबाबत संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादKangana Ranautकंगना राणौत