शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

थंडीमुळे नवरदेव पडला बेशुद्ध; वधूने दिला लग्नास नकार , रिकाम्या हाताने परतली लग्नाची वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:14 IST

झारखंडमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे एका तरुणाचे लग्न मोडलं आहे.

Shocking News : उत्तर भारतासह संपूर्ण देशात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे नागरिक थंडीपासून वाचण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. दुसरीकडे या कालावधीत अनेक मुहूर्त असल्याने देशभरात लग्नसराई सुरु आहे. मात्र या कडाक्याच्या थंडीमुळे छत्तीसगडमध्ये एक लग्न मोडलं आहे. लग्नमंडपात थंडीमुळे नवरदेव बेशुद्ध पडल्याने वधूने लग्न मोडलं आहे. त्यामुळे तरुणाला रिकाम्या हाताने वरात घेऊन माघारी फिरावं लागलं.

झारखंडच्या जगप्रसिद्ध द्वादश ज्योतिर्लिंग बाबा बैद्यनाथ धाममध्ये अनेक विवाह होतात जे चर्चेचा विषय बनतात. मात्र देवघर जिल्ह्यातील मोहनपूर  परिसरात असलेल्या घोरमारा येथे कडाक्याची थंडीच्या लाटेत लग्न करणे एका तरुणाला महागात पडले. थंडीमुळे या तरुणाचे लग्न होण्याआधीच तुटले. अर्णव नावाच्या मुलाचे लग्न अंकिता नावाच्या मुलीशी होणार होते. दोन्ही पक्षांच्या संमतीने हा विवाह एका खासगी गार्डन कॅम्पसमध्ये होत होता. थंडी असूनही सर्व काही उत्साहात सुरु होते. लग्नाआधीचे सर्व विधी वेळेत पूर्णही झाले होते.

सुरुवातील दोन्ही पक्षांच्या भेटीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर वरमालाच्या विधीसाठी मोकळ्या आकाशाखाली स्टेज बांधण्यात आला. तिथेच वधू वर एकमेकांना वरमाला घालणार होते. त्यानंतर सर्वजण लग्नमंडपात पोहोचले. जेवणानंतर वधू-वरही मंडपात आले. त्यानंतर भटजींनी विवाह विधी सुरू केला. दरम्यान, अचानक नवरदेव बेशुद्ध पडला. नवरदेवाचे अंग थंड झाले होते. घरच्यांनी घाईघाईने नवरदेवाला खोलीत नेले आणि त्याचे हातपाय चोळायला सुरुवात केली.

त्यानंतर जवळच्या डॉक्टरांना बोलवून आणण्यात आलं. थंडी कमी होण्यासाठी नवरदेवाला सलाईन आणि इंजेक्शन दिलं. सुमारे एक ते दीड तासानंतर नवरदेवाची प्रकृती सामान्य झाली. त्यामुळे तो पुन्हा मंडपात बसण्यास तयार झाला. मात्र वधूने फेरे घेण्यास स्पष्ट नकार दिला. वधूने सांगितले की मुलाला काही आजार आहे, त्यामुळे ती त्याच्याशी लग्न करणार नाही. 

वधूचा संशय वाढला कारण सहसा नवरदेवाच्या लग्नाची वरात ही त्यांच्या घरातून वधूच्या घरी जाते. परंतु या लग्नात वधूच्या पक्षाला वराच्या घरी बोलावून एका खाजगी बागेत लग्न केले जात होते. दोन्ही पक्षातील वाद वाढत जाऊन पहाटेचे ५ वाजले. त्यानंतर हे प्रकरणा पोलिसांत गेले आणि या प्रकरणाची माहिती मोहनपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. याबाबत माहिती मिळताच मोहनपूर पोलीस ठाण्याचे पथक तिथे दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून सांगितले. मात्र कोणताही मार्ग निघाला नाही. सकाळी आठ वाजेपर्यंत बोलणी न झाल्याने अखेर नवरदेव वरात घेऊन घरी निघून आला. तर वधू पक्ष भागलपूर बिहार येथील त्यांच्या घरी परतला. 

टॅग्स :JharkhandझारखंडPoliceपोलिस