शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

थंडीमुळे नवरदेव पडला बेशुद्ध; वधूने दिला लग्नास नकार , रिकाम्या हाताने परतली लग्नाची वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:14 IST

झारखंडमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे एका तरुणाचे लग्न मोडलं आहे.

Shocking News : उत्तर भारतासह संपूर्ण देशात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे नागरिक थंडीपासून वाचण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. दुसरीकडे या कालावधीत अनेक मुहूर्त असल्याने देशभरात लग्नसराई सुरु आहे. मात्र या कडाक्याच्या थंडीमुळे छत्तीसगडमध्ये एक लग्न मोडलं आहे. लग्नमंडपात थंडीमुळे नवरदेव बेशुद्ध पडल्याने वधूने लग्न मोडलं आहे. त्यामुळे तरुणाला रिकाम्या हाताने वरात घेऊन माघारी फिरावं लागलं.

झारखंडच्या जगप्रसिद्ध द्वादश ज्योतिर्लिंग बाबा बैद्यनाथ धाममध्ये अनेक विवाह होतात जे चर्चेचा विषय बनतात. मात्र देवघर जिल्ह्यातील मोहनपूर  परिसरात असलेल्या घोरमारा येथे कडाक्याची थंडीच्या लाटेत लग्न करणे एका तरुणाला महागात पडले. थंडीमुळे या तरुणाचे लग्न होण्याआधीच तुटले. अर्णव नावाच्या मुलाचे लग्न अंकिता नावाच्या मुलीशी होणार होते. दोन्ही पक्षांच्या संमतीने हा विवाह एका खासगी गार्डन कॅम्पसमध्ये होत होता. थंडी असूनही सर्व काही उत्साहात सुरु होते. लग्नाआधीचे सर्व विधी वेळेत पूर्णही झाले होते.

सुरुवातील दोन्ही पक्षांच्या भेटीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर वरमालाच्या विधीसाठी मोकळ्या आकाशाखाली स्टेज बांधण्यात आला. तिथेच वधू वर एकमेकांना वरमाला घालणार होते. त्यानंतर सर्वजण लग्नमंडपात पोहोचले. जेवणानंतर वधू-वरही मंडपात आले. त्यानंतर भटजींनी विवाह विधी सुरू केला. दरम्यान, अचानक नवरदेव बेशुद्ध पडला. नवरदेवाचे अंग थंड झाले होते. घरच्यांनी घाईघाईने नवरदेवाला खोलीत नेले आणि त्याचे हातपाय चोळायला सुरुवात केली.

त्यानंतर जवळच्या डॉक्टरांना बोलवून आणण्यात आलं. थंडी कमी होण्यासाठी नवरदेवाला सलाईन आणि इंजेक्शन दिलं. सुमारे एक ते दीड तासानंतर नवरदेवाची प्रकृती सामान्य झाली. त्यामुळे तो पुन्हा मंडपात बसण्यास तयार झाला. मात्र वधूने फेरे घेण्यास स्पष्ट नकार दिला. वधूने सांगितले की मुलाला काही आजार आहे, त्यामुळे ती त्याच्याशी लग्न करणार नाही. 

वधूचा संशय वाढला कारण सहसा नवरदेवाच्या लग्नाची वरात ही त्यांच्या घरातून वधूच्या घरी जाते. परंतु या लग्नात वधूच्या पक्षाला वराच्या घरी बोलावून एका खाजगी बागेत लग्न केले जात होते. दोन्ही पक्षातील वाद वाढत जाऊन पहाटेचे ५ वाजले. त्यानंतर हे प्रकरणा पोलिसांत गेले आणि या प्रकरणाची माहिती मोहनपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. याबाबत माहिती मिळताच मोहनपूर पोलीस ठाण्याचे पथक तिथे दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून सांगितले. मात्र कोणताही मार्ग निघाला नाही. सकाळी आठ वाजेपर्यंत बोलणी न झाल्याने अखेर नवरदेव वरात घेऊन घरी निघून आला. तर वधू पक्ष भागलपूर बिहार येथील त्यांच्या घरी परतला. 

टॅग्स :JharkhandझारखंडPoliceपोलिस