शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Ropeway Accident: 20 तासांपासून हवेत लटकतायत 48 लोक, बचावकार्यात लष्करालाही येत आहेत अडचणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 12:28 IST

रामनवमीनिमित्त रविवारी शेकडो पर्यटक येथे पूजेसाठी आले होते. याच दरम्यान रोपवेची एक ट्रॉली वरून खाली येत असताना, खालून वर जाणाऱ्या एका ट्रॉलीला धडकली.

झारखंडमधील सर्वात उंच असलेल्या, त्रिकूट रोपवेवर झालेल्या अपघातात अद्याप 48 जण हवेतच अडकलेले आहेत. या रोपवेवर रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ट्रॉलिज एकमेकांवर धडकल्या होत्या. यामुळे लोक पहाडावरच अडकले आहेत. एनडीआरएफ रात्री उशिरा बचाव कार्याला सुरुवात केली आहे. यानंतर लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले. मात्र, अद्याप लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढता आलेले नाही.

रामनवमीनिमित्त रविवारी शेकडो पर्यटक येथे पूजेसाठी आणि फिरण्यासाठी आले होते. याच दरम्यान रोपवेची एक ट्रॉली वरून खाली येत असताना, खालून वर जाणाऱ्या एका ट्रॉलीला धडकली. या अपघातात ट्रॉलीमधील लोक जखमी झाले आहेत. हा अपघात झाला तेव्हा जवळपास दोन डझन ट्रॉलीज हवेतच होत्या. यानतंर घाईघाईने अनेकांना सुरक्षितपणे काढण्यात आले. तसेच, या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचेही बोलले जात आहे.हा अपघात होऊन साधारणपणे 20-22 तास झाले आहेत. मात्र, अद्यापही 48 जण हवेत अडकलेले आहेत. हे लोक एकूण 18 ट्रॉलीजमध्ये बसलेले आहेत. या लोकांचा बचाव करण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर जसे त्यांच्याजवळ पोहोचत आहे, तसे हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या हवेमुळे ट्रॉलीज हेलकावे खात आहेत. यामुळे त्यात बसलेल्या लोकांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे.

ड्रोनच्या माध्यमानं पोहोचवलं जातंय अन्न-पाणी -रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अथक प्रयत्नांनंतरही बचाव पथकाला अद्याप यश आलेले नाही. या अडकलेल्या लोकांपर्यंत ड्रोनच्या माध्यमाने अन्न-पाणी पोहोचवले जात आहे. ट्रॉलींमध्ये लहान मुले, महिला, पुरुष आदींचा  समावेश आहे.

यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी मंजुनाथ भाईजंत्री म्हणाले, 'सध्या रोपवे बंद आहे, ट्रॉली डिस्प्लेस झाल्याने हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एनडीआरएफसह लष्कराचीही मदत घेण्यात येत आहे. यासंदर्भात कुठल्याही अफवेकडे लक्ष देऊ नये. 

टॅग्स :JharkhandझारखंडAccidentअपघातIndian Armyभारतीय जवान