शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

"रेल्वेमंत्र्यांनी रील बनवणं सोडून द्यावं"; अपघातावरुन ममता-अखिलेश यांचा मोदी सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 13:03 IST

Jharkhand Train Accident : सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांवरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. २०१४ पासून मोदी सरकारच्या काळात झालेल्या अपघातांचा उल्लेख करून काँग्रेसने केंद्रावर हल्लाबोल केला.

झारखंडच्या सरायकेला-खरसावां जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मुंबई-हावडा मेलचा अपघात झाला. या अपघातात १८ डबे रुळावरून घसरले, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांवरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. २०१४ पासून मोदी सरकारच्या काळात झालेल्या अपघातांचा उल्लेख करून काँग्रेसने केंद्रावर हल्लाबोल केला, तर JMM ने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करत रील बनवणं सोडून द्यावं असं म्हटलं आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटलं की, "रेल्वे अपघात आता नियमित झाले आहेत. दर आठवड्याला घटना घडत आहेत. सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. झारखंडमध्ये हावडा-मुंबई मेल रुळावरून घसरली. यात अनेकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. हे खूप दुःखद आहे."

"रेल्वे रुळांवर प्रवाशांच्या मृत्यूची आणि जखमींची मालिका किती दिवस सुरू राहणार? हे आम्ही किती दिवस सहन करणार? भारत सरकारच्या असंवेदनशीलतेला अंत होणार नाही का?" सपा खासदार अखिलेश यादव य़ांनी देखील यावर भाष्य केलं आहे. सरकारला प्रत्येक क्षेत्रात रेकॉर्ड बनवायचे आहे. सध्या पेपरफुटीचे रेकॉर्ड सुरू होते. यामागे रेल्वे अपघातांचे रेकॉर्ड तयार केले जात आहे. एवढे मोठे सुरक्षा बजेट असतानाही इतके रेल्वे अपघात का होत आहेत? असा सवाल विचारला आहे. 

झारखंड मुक्ती मोर्चानेही याप्रकरणी केंद्र सरकारला धारेवर धरलं. रेल्वेमंत्र्यांनी रील बनवणं थांबवावं आणि रेल्वेवर लक्ष केंद्रित करावं. हेमंत सोरेन किंवा इंडिया आघाडीचा यात कोणताही हात नाही. आम्हाला ईडी-सीबीआयमध्ये अडकवण्याची धमकी देऊ नका असं म्हटलं आहे. "रेल्वे अपघात सातत्याने होत आहेत. हे लाजिरवाणे आहे. रेल्वे अपघातांवर कारवाई होत नाही. आमचे रेल्वेमंत्री केवळ प्रचारात व्यस्त आहेत" असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAkhilesh Yadavअखिलेश यादवrailwayरेल्वेAccidentअपघात