शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

"रेल्वेमंत्र्यांनी रील बनवणं सोडून द्यावं"; अपघातावरुन ममता-अखिलेश यांचा मोदी सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 13:03 IST

Jharkhand Train Accident : सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांवरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. २०१४ पासून मोदी सरकारच्या काळात झालेल्या अपघातांचा उल्लेख करून काँग्रेसने केंद्रावर हल्लाबोल केला.

झारखंडच्या सरायकेला-खरसावां जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मुंबई-हावडा मेलचा अपघात झाला. या अपघातात १८ डबे रुळावरून घसरले, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांवरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. २०१४ पासून मोदी सरकारच्या काळात झालेल्या अपघातांचा उल्लेख करून काँग्रेसने केंद्रावर हल्लाबोल केला, तर JMM ने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करत रील बनवणं सोडून द्यावं असं म्हटलं आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटलं की, "रेल्वे अपघात आता नियमित झाले आहेत. दर आठवड्याला घटना घडत आहेत. सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. झारखंडमध्ये हावडा-मुंबई मेल रुळावरून घसरली. यात अनेकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. हे खूप दुःखद आहे."

"रेल्वे रुळांवर प्रवाशांच्या मृत्यूची आणि जखमींची मालिका किती दिवस सुरू राहणार? हे आम्ही किती दिवस सहन करणार? भारत सरकारच्या असंवेदनशीलतेला अंत होणार नाही का?" सपा खासदार अखिलेश यादव य़ांनी देखील यावर भाष्य केलं आहे. सरकारला प्रत्येक क्षेत्रात रेकॉर्ड बनवायचे आहे. सध्या पेपरफुटीचे रेकॉर्ड सुरू होते. यामागे रेल्वे अपघातांचे रेकॉर्ड तयार केले जात आहे. एवढे मोठे सुरक्षा बजेट असतानाही इतके रेल्वे अपघात का होत आहेत? असा सवाल विचारला आहे. 

झारखंड मुक्ती मोर्चानेही याप्रकरणी केंद्र सरकारला धारेवर धरलं. रेल्वेमंत्र्यांनी रील बनवणं थांबवावं आणि रेल्वेवर लक्ष केंद्रित करावं. हेमंत सोरेन किंवा इंडिया आघाडीचा यात कोणताही हात नाही. आम्हाला ईडी-सीबीआयमध्ये अडकवण्याची धमकी देऊ नका असं म्हटलं आहे. "रेल्वे अपघात सातत्याने होत आहेत. हे लाजिरवाणे आहे. रेल्वे अपघातांवर कारवाई होत नाही. आमचे रेल्वेमंत्री केवळ प्रचारात व्यस्त आहेत" असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAkhilesh Yadavअखिलेश यादवrailwayरेल्वेAccidentअपघात