शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बिहारमध्येही 'झारखंड पॅटर्न'? काँग्रेस दुय्यम भूमिका स्वीकारण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:05 IST

राजदला अधिक महत्त्व देण्यास राजी

पाटणा : झारखंडमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर तेथे अवलंबिलेली रणनीती काँग्रेस बिहार विधानसभा निवडणुकांमध्येही वापरण्याची शक्यता आहे. सत्ताधारी जनता दल (यू), भाजप युतीच्या विरोधात लढताना राष्ट्रीय जनता दल (राजद) या घटक पक्षाला काँग्रेस अधिक महत्त्व देण्याची शक्यता आहे.झारखंड मुक्ती मोर्चाशी (झामुमो) आघाडी करताना काँग्रेसने काहीशी दुय्यम भूमिका स्वीकारली होती. तेथील विधानसभा निवडणुकीत आघाडीचा विजय झाल्यानंतर झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन हेच मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा काँग्रेसने केली. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झामुमो, काँग्रेस, राजदने झारखंडमध्ये सरकार स्थापन केले.बिहारमधील सध्याच्या विधानसभेची मुदत यावर्षी २९ नोव्हेंबरला संपत आहे. काँग्रेसने दूरदृष्टीने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राजदला अधिक महत्त्व देण्यास, तसेच त्या पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांना आघाडीतर्फे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास काँग्रेस राजी असल्याचे कळते. काँग्रेस, राजदच्या आघाडीत उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष (आरएलएसपी) तसेच जीतनराम माझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा, विकासशील इन्सान पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिन) हे पक्षही सामील होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपासाठी एप्रिल-मेच्या सुमारास चर्चा होईल; पण आघाडीने बिहार विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी आतापासूनच सुरू केली आहे, असे काँग्रेसचे बिहारचे प्रभारी शक्तिसिंह गोहील यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :congressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपा