शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

बिहारमध्येही 'झारखंड पॅटर्न'? काँग्रेस दुय्यम भूमिका स्वीकारण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:05 IST

राजदला अधिक महत्त्व देण्यास राजी

पाटणा : झारखंडमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर तेथे अवलंबिलेली रणनीती काँग्रेस बिहार विधानसभा निवडणुकांमध्येही वापरण्याची शक्यता आहे. सत्ताधारी जनता दल (यू), भाजप युतीच्या विरोधात लढताना राष्ट्रीय जनता दल (राजद) या घटक पक्षाला काँग्रेस अधिक महत्त्व देण्याची शक्यता आहे.झारखंड मुक्ती मोर्चाशी (झामुमो) आघाडी करताना काँग्रेसने काहीशी दुय्यम भूमिका स्वीकारली होती. तेथील विधानसभा निवडणुकीत आघाडीचा विजय झाल्यानंतर झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन हेच मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा काँग्रेसने केली. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झामुमो, काँग्रेस, राजदने झारखंडमध्ये सरकार स्थापन केले.बिहारमधील सध्याच्या विधानसभेची मुदत यावर्षी २९ नोव्हेंबरला संपत आहे. काँग्रेसने दूरदृष्टीने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राजदला अधिक महत्त्व देण्यास, तसेच त्या पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांना आघाडीतर्फे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास काँग्रेस राजी असल्याचे कळते. काँग्रेस, राजदच्या आघाडीत उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष (आरएलएसपी) तसेच जीतनराम माझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा, विकासशील इन्सान पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिन) हे पक्षही सामील होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपासाठी एप्रिल-मेच्या सुमारास चर्चा होईल; पण आघाडीने बिहार विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी आतापासूनच सुरू केली आहे, असे काँग्रेसचे बिहारचे प्रभारी शक्तिसिंह गोहील यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :congressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपा