शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

झारखंड सरकार पाडण्यासाठी आसाममध्ये रचले जात होते षडयंत्र? मुख्यमंत्री हिमंता यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 21:06 IST

Jharkhand Political Crisis: पश्चिम बंगालच्या हावडा येथे मोठ्या रकमेसह पकडलेले झारखंडमधील तीन आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली :  पश्चिम बंगालमधील हावडा येथे शनिवारी झारखंडमधीलकाँग्रेसच्या तीन आमदारांना मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह अटक केल्याप्रकरणी वाद अधिकच चिघळत चालला आहे. झारखंडमध्येकाँग्रेस अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी आसाममध्ये झारखंड सरकार अस्थिर करण्याचा षडयंत्र रचले जात असल्याचा दावा केला आहे. तसेच, आजकाल आसाम हे सरकार पाडण्याचे केंद्रबिंदू बनले आहे, असे  राजेश ठाकूर यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा उल्लेख करत म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आता काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसशी दीर्घकाळ संबंध असल्याने मी पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असतो, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. पण झारखंड सरकार पाडण्याच्या कथित कटातील आपल्या भूमिकेचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेस नेते माझे जुने मित्र आहेत आणि सर्वांना हे माहित आहे. तसेच, ते म्हणाले की, काँग्रेस नेते जुने मित्र म्हणून माझ्याशी संपर्कात असतात. मी 20 वर्षांहून अधिक काळ त्या पक्षात होतो. इथे आल्यावर ते मला भेटतात. मी नवी दिल्लीत असताना त्यांना भेटतो. दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत.

आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात?पश्चिम बंगालच्या हावडा येथे मोठ्या रकमेसह पकडलेले झारखंडमधील तीन आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पश्चिम बंगाल पोलिसांनी शनिवारी रात्री काँग्रेसचे तीन आमदार इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन बिक्सल कांग्री यांना हावडा येथील रानीहाटीमध्ये राष्ट्रीय महामार्ग-16 वर अडवले आणि त्यांच्या वाहनातून मोठी रोकड जप्त करण्यात आली. रविवारी दुपारी पोलिसांनी त्यांना अटक केली. 

टॅग्स :Jharkhandझारखंडcongressकाँग्रेसAssamआसाम