शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

झारखंड सरकार पाडण्यासाठी आसाममध्ये रचले जात होते षडयंत्र? मुख्यमंत्री हिमंता यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 21:06 IST

Jharkhand Political Crisis: पश्चिम बंगालच्या हावडा येथे मोठ्या रकमेसह पकडलेले झारखंडमधील तीन आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली :  पश्चिम बंगालमधील हावडा येथे शनिवारी झारखंडमधीलकाँग्रेसच्या तीन आमदारांना मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह अटक केल्याप्रकरणी वाद अधिकच चिघळत चालला आहे. झारखंडमध्येकाँग्रेस अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी आसाममध्ये झारखंड सरकार अस्थिर करण्याचा षडयंत्र रचले जात असल्याचा दावा केला आहे. तसेच, आजकाल आसाम हे सरकार पाडण्याचे केंद्रबिंदू बनले आहे, असे  राजेश ठाकूर यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा उल्लेख करत म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आता काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसशी दीर्घकाळ संबंध असल्याने मी पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असतो, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. पण झारखंड सरकार पाडण्याच्या कथित कटातील आपल्या भूमिकेचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेस नेते माझे जुने मित्र आहेत आणि सर्वांना हे माहित आहे. तसेच, ते म्हणाले की, काँग्रेस नेते जुने मित्र म्हणून माझ्याशी संपर्कात असतात. मी 20 वर्षांहून अधिक काळ त्या पक्षात होतो. इथे आल्यावर ते मला भेटतात. मी नवी दिल्लीत असताना त्यांना भेटतो. दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत.

आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात?पश्चिम बंगालच्या हावडा येथे मोठ्या रकमेसह पकडलेले झारखंडमधील तीन आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पश्चिम बंगाल पोलिसांनी शनिवारी रात्री काँग्रेसचे तीन आमदार इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन बिक्सल कांग्री यांना हावडा येथील रानीहाटीमध्ये राष्ट्रीय महामार्ग-16 वर अडवले आणि त्यांच्या वाहनातून मोठी रोकड जप्त करण्यात आली. रविवारी दुपारी पोलिसांनी त्यांना अटक केली. 

टॅग्स :Jharkhandझारखंडcongressकाँग्रेसAssamआसाम