शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांची सामूहिक आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 09:18 IST

नवी दिल्लीतील बुरारी येथील एकाच कुटुंबातील 11 जणांची सामूहिक आत्महत्या प्रकरण ताजे असताना झारखंडमध्येही एकाच कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

झारखंड - नवी दिल्लीतील बुरारी येथील एकाच कुटुंबातील 11 जणांची सामूहिक आत्महत्या प्रकरण ताजे असताना झारखंडमध्येही एकाच कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सहा सदस्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. यातील 5 जणांनी गळफास घेतला तर एका व्यक्तीनं छतावरुन उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. मृतांमध्ये आई-वडील, मुलगा-मुलगी आणि नातवंडांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे राजधानी नवी दिल्लीतील बुरारी परिसरातील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. 

(Burari Deaths : त्या 11 जणांच्या आत्महत्येमागे 5 आत्म्यांचा हात?)

बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरण

दिल्लीच्या बुरारी भागातील संतनगरमधील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. 1 जुलैला ही धक्कादायक घटना समोर आली होती. भाटिया कुटुंबातील 11 पैकी 10 सदस्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर वयोवृद्ध महिलेचा मृतदेह घरातील दुसऱ्या खोलीत आढळला होता. नारायणी देवी (77 वर्ष) यांच्यासोबत त्यांची मुलगी प्रतिभा (57 वर्ष) आणि त्यांची दोन मुलं भवनेश (50 वर्ष) आणि ललित (45 वर्ष) यांच्याशिवाय, भवनेश यांची पत्नी सविता (48 वर्ष) यांच्यासहीत त्यांची तीन मुलं मनिका (23 वर्ष), नीतू (25 वर्ष), धीरेंद्र (15 वर्ष) आणि ललित व त्याची  पत्नी टीना (42 वर्ष) ,त्यांचा मुलगा दुष्यंत (15 वर्ष) आणि प्रतिभा यांची मुलगी प्रियंका (33 वर्ष) मृतावस्थेत आढळले होते. 

भाटिया कुटुंबाच्या समोर राहणाऱ्या एका घराबाहेर सीसीटीव्ही आहे. या सीसीटीव्ही 30 जूनला घडलेल्या घटना कैद झाल्या आहेत. यामध्ये भाटिया कुटुंबातील दोघी घरात टेबल घेऊन जाताना दिसत आहेत. भाटिया कुटुंबानं आधी घरात टेबल आणले. त्यानंतर रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी समोरच्या दुकानातून वायर आणण्यात आल्या. ललित आणि भुवनेश भाटिया यांच्या मुलांनी समोरच्या दुकानातू वायर आणल्या. याच वायरचा वापर गळफास घेताना करण्यात आला. विशेष म्हणजे भाटिया कुटुंबाशिवाय घरात कोणीही नव्हतं. त्यांच्या घरात कोणीही जबरदस्ती घुसत असल्याचं सीसीटीव्हीत आढळून आलेलं नाही. याशिवाय घरातील कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर जबरदस्ती झाल्याच्या खुणा नाहीत. त्यामुळे या कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केली, हे स्पष्ट झालं आहे. पोलिसांना घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये मृत्यू हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे, अशा संदर्भाचा मजकूर आहे. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी या कुटुंबानं आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हाDeathमृत्यूFamilyपरिवार