शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांची सामूहिक आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 09:18 IST

नवी दिल्लीतील बुरारी येथील एकाच कुटुंबातील 11 जणांची सामूहिक आत्महत्या प्रकरण ताजे असताना झारखंडमध्येही एकाच कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

झारखंड - नवी दिल्लीतील बुरारी येथील एकाच कुटुंबातील 11 जणांची सामूहिक आत्महत्या प्रकरण ताजे असताना झारखंडमध्येही एकाच कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सहा सदस्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. यातील 5 जणांनी गळफास घेतला तर एका व्यक्तीनं छतावरुन उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. मृतांमध्ये आई-वडील, मुलगा-मुलगी आणि नातवंडांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे राजधानी नवी दिल्लीतील बुरारी परिसरातील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. 

(Burari Deaths : त्या 11 जणांच्या आत्महत्येमागे 5 आत्म्यांचा हात?)

बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरण

दिल्लीच्या बुरारी भागातील संतनगरमधील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. 1 जुलैला ही धक्कादायक घटना समोर आली होती. भाटिया कुटुंबातील 11 पैकी 10 सदस्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर वयोवृद्ध महिलेचा मृतदेह घरातील दुसऱ्या खोलीत आढळला होता. नारायणी देवी (77 वर्ष) यांच्यासोबत त्यांची मुलगी प्रतिभा (57 वर्ष) आणि त्यांची दोन मुलं भवनेश (50 वर्ष) आणि ललित (45 वर्ष) यांच्याशिवाय, भवनेश यांची पत्नी सविता (48 वर्ष) यांच्यासहीत त्यांची तीन मुलं मनिका (23 वर्ष), नीतू (25 वर्ष), धीरेंद्र (15 वर्ष) आणि ललित व त्याची  पत्नी टीना (42 वर्ष) ,त्यांचा मुलगा दुष्यंत (15 वर्ष) आणि प्रतिभा यांची मुलगी प्रियंका (33 वर्ष) मृतावस्थेत आढळले होते. 

भाटिया कुटुंबाच्या समोर राहणाऱ्या एका घराबाहेर सीसीटीव्ही आहे. या सीसीटीव्ही 30 जूनला घडलेल्या घटना कैद झाल्या आहेत. यामध्ये भाटिया कुटुंबातील दोघी घरात टेबल घेऊन जाताना दिसत आहेत. भाटिया कुटुंबानं आधी घरात टेबल आणले. त्यानंतर रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी समोरच्या दुकानातून वायर आणण्यात आल्या. ललित आणि भुवनेश भाटिया यांच्या मुलांनी समोरच्या दुकानातू वायर आणल्या. याच वायरचा वापर गळफास घेताना करण्यात आला. विशेष म्हणजे भाटिया कुटुंबाशिवाय घरात कोणीही नव्हतं. त्यांच्या घरात कोणीही जबरदस्ती घुसत असल्याचं सीसीटीव्हीत आढळून आलेलं नाही. याशिवाय घरातील कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर जबरदस्ती झाल्याच्या खुणा नाहीत. त्यामुळे या कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केली, हे स्पष्ट झालं आहे. पोलिसांना घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये मृत्यू हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे, अशा संदर्भाचा मजकूर आहे. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी या कुटुंबानं आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हाDeathमृत्यूFamilyपरिवार