शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

झारखंड निवडणूक: पहिल्या टप्प्यातील १३ विधानसभा जागांसाठी आज मतदान; पोलिसांचा चोख बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 08:00 IST

झारखंड पाच टप्प्यात मतदान होणार आहे

जमशेदपूर -  30 नोव्हेंबरपासून झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. या टप्प्यात चत्रा, बिशुनपूर, लातेहार, गुमला, लोहरदगा, पनकी, माणिका, विश्रामपूर, हुसेनाबाद, डाल्टनगंज, छतरपूर, भवनाथपूर, गढवा या जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांवर एकूण 189 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

झारखंड पाच टप्प्यात मतदान होणार आहे, पहिला टप्पा 30 नोव्हेंबरला आणि शेवटचा टप्पा 20 डिसेंबरला असणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होईल. पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त भाग असल्याने मतदानाची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. येथे 37,83,055 मतदार नक्षलग्रस्त 6 जिल्ह्यातील 13 विधानसभा जागांवर 189 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. भवनाथपूर मतदारसंघातून जास्तीत जास्त 28 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

लातेहार आणि माणिका येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी येथे नक्षलवादी हल्ला झाला होता. शनिवारी या ठिकाणी शांततेत मतदान होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने ६५ जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे. भाजपला सत्ता टिकवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत द्यायची असून, आता एकाच वेळी अनेकांशी दोन हात करावे लागणार आहेत. अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेशी (एजेएसयू) पक्षाचे मतभेद झालेले असून, ते दूर करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. त्यातच एनडीएचे सहकारी पक्ष जदयू आणि लोजपा हे स्वबळावर लढत आहेत. महागठबंधनचे आव्हान वेगळेच आहे. 

लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वबळावर ५० जागा लढवण्याची घोषणा नुकतीच केल्याने भाजपला झटका बसला आहे. या निवडणुकीत युती करण्यासाठी आम्ही विचारले असता भाजपकडून काहीच उत्तर आले नव्हते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. जदयूने सर्वप्रथम स्वबळावर लढण्याची घोषणा करून भाजपची कोंडी केली.

टॅग्स :Votingमतदानjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपा