शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अमित शहांची मुख्यमंत्र्यांबद्दलची 'ती' भीती खरी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 13:00 IST

महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही भाजपाला धक्का

रांची: झारखंडमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं हिंदी पट्ट्यातलं आणखी एक महत्त्वाचं राज्य भाजपाच्या हातातून निसटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र झारखंडच्या मतदारांनी झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या महाआघाडीच्या बाजूनं कौल देत भाजपाला जोरदार धक्का दिला. या पराभवामुळे अमित शहांनी वर्तवलेली शक्यता खरी ठरली आहे. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी बोलताना अमित शहांनी राज्यांमधील भाजपा नेतृत्त्वांवर भाष्य केलं होतं. 'जातीच्या आधारावर आम्ही नेतृत्त्वाची निवड करत नाही. आमच्या पक्षाला यामुळे नुकसानदेखील सहन करावं लागतं. मात्र जातीच्या निकषावर आम्ही कधीही अशा प्रकारचे निर्णय घेत नाही,' असं शहा म्हणाले होते. त्यांच्या विधानाला झारखंडसोबतच महाराष्ट्र, हरयाणातील मुख्यमंत्र्यांचा संदर्भ होता. आदिवासीबहुल झारखंडमध्ये बिगरआदिवासी रघुबर दास यांना पक्षानं मुख्यमंत्रिपद दिलं होतं. तर मराठ्यांचं वर्चस्व असलेल्या महाराष्ट्राची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली होती. हरयाणात जाटांचं प्राबल्य असूनही बिगरजाट समुदायातील मनोहरलाल खट्टर यांची भाजपाकडून मुख्यमंत्रिपदी वर्णी लावण्यात आली.हरयाणा, महाराष्ट्र, झारखंडमध्ये स्थानिक बहुसंख्य समुदायातील नेत्यांना डावलून सामाजिकदृष्ट्या फारशी ताकद नसलेल्या समुदायातील नेत्यांना मुख्यमंत्रिपद देणं ही भाजपाची रणनीती आहे का, असा प्रश्न शहांना विचारण्यात आला. त्यावर लोकशाहीत जातीवादापेक्षा कामगिरीला महत्त्व देऊन नेतृत्त्वाची निवड करायला हवी. कोणीतरी त्या दृष्टीनं पावलं टाकायला हवीत. पंतप्रधान मोदींनी त्या दिशेनं काम सुरू केलं आहे. यामुळे कदाचित आम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं, अशी भीती अमित शहांनी व्यक्त केली होती. झारखंडच्या निवडणुकीत शहांचं हे विधान खरं ठरल्याचं दिसत आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा