शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

आजपासून झारखंडमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात! विजयानंतर हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 18:30 IST

विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा कल स्पष्ट झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडमधील जनतेचे आभार मानले

रांची - झारखंडमध्ये  झामुमो, काँग्रेस  आणि राजद आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर झामुमो चे नेते हेमंत सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा कल स्पष्ट झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडमधील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच आजपासून राज्यात एक नवा अध्याय सुरू झाला असून, कुठल्याही जातीधर्माच्या, पंथाच्या, कुठलाही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा अपेक्षाभंग होऊ दिला जाणार नाही, याचे मी आश्वासन देतो. 

झारखंड मुक्ती मोर्चाचा विजय निश्चित झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हेमंत सोरेन म्हणाले की, स्पष्ट बहुमत देणाऱ्या राज्यातील जनतेचे मी आभार मानतो. माझ्यावर विश्वास दर्शवल्याबद्दल मी लालू प्रसाद यादव, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांचेही आभार मानतो. आजपासून राज्यात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. राज्यात कुठल्याही जातीधर्माच्या, पंथाच्या, कुठलाही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा अपेक्षाभंग होऊ दिला जाणार नाही, याचे मी आश्वासन देतो.  

झारखंड विधानसभा निवडणुकीचा कल आता जवळपास स्पष्ट होत आला आहे. संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला तरी आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाचा पराभव होणार असल्याचे आणि सर्वात मोठी आघाडी ठरलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीचे राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडी 46 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 25 जागांवर आघाडीवर आहे. 

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019Jharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाJharkhandझारखंडPoliticsराजकारण