शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ दिवसांत सुटली; नवऱ्यासोबत आक्रित घडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:35 IST

तरुण सकाळी दुकानात जातो असं सांगून घरातून निघून गेला. पण त्यानंतर तो परतलाच नाही. त्याचा मोबाईलही बंद होता.

उत्तर प्रदेशातील झाशी येथे लग्नानंतर सात दिवसांनी रेल्वेची धडक बसल्याने वराचा मृत्यू झाला. झाशी-कानपूर रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलीस तपास करत आहेत. हा तरुण सकाळी दुकानात जातो असं सांगून घरातून निघून गेला. पण त्यानंतर तो परतलाच नाही. त्याचा मोबाईलही बंद होता.

हे संपूर्ण प्रकरण झाशी जिल्ह्यातील भरोसा गावातील आहे, जिथे २१ वर्षीय शिवम अहिरवार हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची मोठी बहीण संगीता विवाहित आहे. वडील शेती करतात. तरुणाचे काका जयप्रकाश यांनी सांगितलं की, शिवम हा बलरामपूर येथे त्याच्या भावोजीच्या घरी राहत असताना पाणीपुरीचं काम करायचा. 

११ डिसेंबर रोजी त्याचं लग्न दतिया येथील कालीपुरा गावात राहणाऱ्या काजलसोबत झाला होता. लग्नानंतर सून घरीच होती. घरात आनंदाचे वातावरण होतं. मात्र एक दिवस अचानक सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिवम दुकानात जातो असं सांगून घरातून निघून गेला, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याला फोन केला असता त्याचा फोन बंद होता.

कुटुंबीयांना संशय आल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला. दुपारी रेल्वे रुळाजवळ एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो मृतदेह शिवमचा होता. याची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ उडाली. नवविवाहित वधू काजल बेशुद्ध पडली.

याप्रकरणी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गोपीनाथ सोनी यांनी सांगितलं की, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जयप्रकाश यांच्याकडून माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. सध्या पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न