शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

बापरे! ...म्हणून 'त्या' गावात जिवंत माणसाची काढण्यात आली अंत्ययात्रा; जाणून घ्या, नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:55 IST

Jhabua Funeral of a living man : थेट जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढण्यात आल्याची अजब घटना घडली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये (Jhabua) चांगला पाऊसच पडत नाही. तेथील लोक गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक ठिकाणी पाऊस चांगला पडावा म्हणून विविध गोष्टी देखील केल्या जातात. चित्र-विचित्र प्रकार केले जातात. झाबुआमधील लोकांनी देखील इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. भरपूर पाऊस पडावा म्हणून शहरात थेट जिवंत माणसाची अंत्ययात्रा (Funeral of a living man) काढण्यात आल्याची अजब घटना घडली आहे. इंद्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी गावकरी अशा विचित्र वाटणाऱ्या पद्धतीचा अवलंब करत असतात. 

लोकांचा विश्वास आहे की या प्रकारामुळे इंद्रदेव प्रसन्न होतील आणि जोरदार पाऊस पडेल. अशोक नावाच्या तरुणाची जिवंत अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. अशोकने दिलेल्या माहितीनुसार, "जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. जर पाऊस पडला नाही तर बियाणं वाया जातील. अशात लवकरात लवकर पाऊस पडण्याची गरज आहे. जेव्हा पाऊस हुलकावणी देतो तेव्हा गावकरी अशा प्रकारे अंत्ययात्रा काढतात. जिल्ह्यात अद्याप पावसाचा हवा तसा जोर दिसत नाही. गावकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचं संकट ओढवलं आहे."

"महागाईही वाढली आहे. अशात दुबार पेरणी करावी लागली तर शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडेल" असं देखील अशोकने म्हटलं आहे. गावात अशाप्रकारे पावसासाठी निसर्गाची पूजा केली जाते. जेणेकरून चांगला पाऊस पडेल आणि यंदा उत्तम पीक येईल अशी लोकांची आशा आहे. झाबुआ जिल्ह्यात प्रामुख्याने मका आणि सोयाबीनचं पीक घेतलं जातं. जिल्ह्यातील बहुतांश गरीब आदिवासी हे आपल्या शेतात मक्याचं पीक घेतात. तसेच झाबुआमधील ग्रामीण भागातील लोकांचं हेच मुख्य भोजन आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशRainपाऊसFarmerशेतकरी