शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

2014 च्या धुंदीतून बाहेर पडा, ही 2019 ची निवडणूक आहे; जदयूचा भाजपाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 16:11 IST

आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 2020 मध्ये होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आत्ताच निश्चित केला जावा.

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून बिहारमध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दल (जदयू) यांच्यातील कुरबुरी वाढल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 2020 मध्ये होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आत्ताच निश्चित केला जावा, यासाठी जदयू भाजपाच्या हात धुवून मागे लागला आहे. मात्र, भाजपा यासाठी फार उत्सुक नसल्याचे चित्र आहे.जदयूच्या नेत्यांना जागावाटपाच्या अपेक्षांविषयी विचारले असता त्यांनी म्हटले की, रालोआतील सर्व घटकपक्षांनी एकत्र बसून याचा निर्णय घ्यायला हवा. सद्यपरिस्थितीचा विचार करून प्रत्येक पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या पाहिजेत, असे जदयूच्या नेत्यांनी म्हटले. मात्र, भाजपाला पुन्हा एकदा 2014 सारखे यश मिळवायचे असल्याने जागावाटपात त्यांच्या जास्त अपेक्षा असतील, याकडे प्रसारमाध्यमांनी जदयूच्या नेत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जदयूच्या नेत्यांनी म्हटले की, ही 2014 नव्हे तर 2019 ची निवडणूक आहे, हे आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल पाहता जनमतात बदल झाल्याचेही दिसत आहे. तसेच 2014 चे निकष लावायचे झाल्यास भाजपाने बिहारमध्ये 40 पैकी 31 जागांवर विजय मिळवला होता. या जागांचा विचार करता भाजपाला विधानसभेच्या  243 पैकी 173 जागांवर यश मिळू शकले असते. तर त्यावेळी जदयूला केवळ दोनच जागा जिंकता आल्या होत्या. रामविलास पासवान आणि उपेंद्र सिंह कुशवाह यांच्या पक्षालाही अनुक्रमे सहा आणि तीन जागा मिळाल्या होत्या. मग आता आगामी निवडणुकीत एवढ्याचा जागा लढवायच्या का, असा सवालही जदयूच्या नेत्यांनी विचारला. या पार्श्वभूमीवर आता भाजपा आपल्या मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी काय पाऊल उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Vidhan Parishadविधान परिषदBJPभाजपाPoliticsराजकारण