शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

जदयुमुळे भाजप काळजीत; झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये मागितल्या अधिक जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 09:42 IST

जदयूला झारखंड निवडणूक भाजप आणि एजेएसयूसोबत लढवायची आहे.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला जागा मिळाव्यात, अशी मागणी जदयूने केली आहे. त्यामुळे भाजप आणि जदयू या दोन पक्षांतील नाते सध्या ताणले गेले आहेत. या दोन राज्यांमध्ये अनुक्रमे डिसेंबर २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये निवडणुका होणार आहेत. 

बिहारमध्ये एनडीए आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या जदयूला इतर राज्यांमध्ये आपला विस्तार करायचा आहे, जेणेकरून राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख निर्माण होईल. दिल्लीतील निवडणुकांमध्ये जदयूचा उद्देश पूर्वांचल मतदारांना आकर्षित करणे हा आहे.

दिल्लीत हव्यात या चार जागा 

जदयूला दिल्लीतील विधानसभा निवडणुकांमध्ये किमान १० जागांवर लढण्याची इच्छा आहे; परंतु ते चार जागांवर तयार होऊ शकतात.

जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद म्हणाले की, पक्षाने यापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली आहे आणि पक्ष पुन्हा भाजपसोबत युती करील. 

जेडीयूला बदरपूर, बुरारी, पालम आणि उत्तमनगर हे मतदारसंघ हवे आहेत. येथे पूर्वांचलच्या मतांचा निवडणूक निकाल ठरवण्यात मोठा प्रभाव आहे.

भाजप काही जागा सोडणार

हरयाणा निवडणूक निकालानंतर लगेचच झारखंड निवडणुकीची घोषणा होईल, असे सांगितले जाते. येथे भाजप आणि जदयू एकत्र लढणार असून, जदयूला तमाड आणि जमशेदपूर पूर्व मतदारसंघाची जागा देण्याची भाजपने तयारी केली आहे.

चिंता का आहे?

जदयूला झारखंड निवडणूक भाजप आणि एजेएसयूसोबत लढवायची आहे. भाजपने एजेएसयूसोबत चर्चा सुरू ठेवली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने स्वतंत्रपणे लढून ८१ पैकी केवळ २५ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला होता. आता झारखंडमध्ये जदयूने जागा मागितल्याने भाजप नेते चिंतित आहेत.

बिहारसाठी विशेष राज्याचा दर्जा आणि पाटणा उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिलेल्या कोटावाढीच्या निर्णयावर विशेष कायदा करण्याची मागणी जेडीयू करीत आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJharkhandझारखंड