शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जदयुमुळे भाजप काळजीत; झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये मागितल्या अधिक जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 09:42 IST

जदयूला झारखंड निवडणूक भाजप आणि एजेएसयूसोबत लढवायची आहे.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला जागा मिळाव्यात, अशी मागणी जदयूने केली आहे. त्यामुळे भाजप आणि जदयू या दोन पक्षांतील नाते सध्या ताणले गेले आहेत. या दोन राज्यांमध्ये अनुक्रमे डिसेंबर २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये निवडणुका होणार आहेत. 

बिहारमध्ये एनडीए आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या जदयूला इतर राज्यांमध्ये आपला विस्तार करायचा आहे, जेणेकरून राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख निर्माण होईल. दिल्लीतील निवडणुकांमध्ये जदयूचा उद्देश पूर्वांचल मतदारांना आकर्षित करणे हा आहे.

दिल्लीत हव्यात या चार जागा 

जदयूला दिल्लीतील विधानसभा निवडणुकांमध्ये किमान १० जागांवर लढण्याची इच्छा आहे; परंतु ते चार जागांवर तयार होऊ शकतात.

जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद म्हणाले की, पक्षाने यापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली आहे आणि पक्ष पुन्हा भाजपसोबत युती करील. 

जेडीयूला बदरपूर, बुरारी, पालम आणि उत्तमनगर हे मतदारसंघ हवे आहेत. येथे पूर्वांचलच्या मतांचा निवडणूक निकाल ठरवण्यात मोठा प्रभाव आहे.

भाजप काही जागा सोडणार

हरयाणा निवडणूक निकालानंतर लगेचच झारखंड निवडणुकीची घोषणा होईल, असे सांगितले जाते. येथे भाजप आणि जदयू एकत्र लढणार असून, जदयूला तमाड आणि जमशेदपूर पूर्व मतदारसंघाची जागा देण्याची भाजपने तयारी केली आहे.

चिंता का आहे?

जदयूला झारखंड निवडणूक भाजप आणि एजेएसयूसोबत लढवायची आहे. भाजपने एजेएसयूसोबत चर्चा सुरू ठेवली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने स्वतंत्रपणे लढून ८१ पैकी केवळ २५ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला होता. आता झारखंडमध्ये जदयूने जागा मागितल्याने भाजप नेते चिंतित आहेत.

बिहारसाठी विशेष राज्याचा दर्जा आणि पाटणा उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिलेल्या कोटावाढीच्या निर्णयावर विशेष कायदा करण्याची मागणी जेडीयू करीत आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJharkhandझारखंड