शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

जाट आंदोलन पेटले!

By admin | Updated: February 20, 2016 03:32 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी हरियाणात सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनाने शुक्रवारी हिंसक वळण घेतले असून, आंदोलकांनी राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घराला आग लावल्याचे वृत्त आहे

चंदीगड : आरक्षणाच्या मागणीसाठी हरियाणात सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनाने शुक्रवारी हिंसक वळण घेतले असून, आंदोलकांनी राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घराला आग लावल्याचे वृत्त आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर २५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. हरियाणातील २१ पैकी १९ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन पसरले असून त्यामुळे राज्यातील बससेवा आणि रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. आज रेल्वेच्या ५५0हून अधिक गाड्यांवर परिणाम झाला. आंदोलनाचे रुद्र स्वरूप पाहून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जाट समाजाला आरक्षण देण्यासाठी विधानसभेत विधेयक आणले जाईल, अशी घोषणा संध्याकाळी केली. या आरक्षणाला विरोधी पक्षांनीही सहमती दर्शवली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही जाट संघर्ष समितीने रात्रीपर्यंत आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली नव्हती.नऊ जिल्ह्यांत लष्कर तैनातहरियाणाच्या नऊ जिल्ह्यांत शुक्रवारी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे तर रोहतक आणि भिवानी येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रोहतक येथे लष्कराला पाचारण करण्यात आले असून, शूट अ‍ॅट साईटचे आदेश देण्यात आले आहेत. जिंद, झज्जर, भिवानी, हिसार, कैथल, सोनिपत, पानिपत व करनाल या जिल्ह्यांमध्ये लवकरच लष्कर रवाना केले जाणार आहे.सर्वपक्षीय बैठकहे आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी प्रशासनाने इंटरनेट आणि एसएमएस सेवा निलंबित केली आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे जाट नसल्याने या आरक्षणाच्या मागणीला विरोध करीत असल्याची टीका जाट नेत्यांनी केली. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.रेल्वेसेवेला फटकाकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी चर्चा केली. या आंदोलनामुळे राज्य सरकारने २१ फेब्रुवारीचे संत रविदास जयंतीचे सारे कार्यक्रम रद्द केले आहेत. आंदोलन मागे न घेतल्यास मुंबई व महाराष्ट्राकडून येणाऱ्या व जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होईल.> आंदोलन मागे घेण्यास जाट नेत्यांचा नकारजाट समाजाच्या लोकांनी ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनात १५ कार व ३० बसेसची तोडफोड केली; तसेच पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयावरही दगडफेक केली. तिथेही पोलिसांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. राज्यातून जाणारे ३ राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व राज्य महामार्ग बंद झालेले आहेत. आंदोलकांनी ठिकठिकाणी रेल्वेगाड्याही अडवून ठेवल्या तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळांवरच ठाण मांडले आणि तिथे अडथळे निर्माण केले. त्यामुळे दिल्ली-अमृतसर मार्ग बंद झाला आहे. सोनीपत-पानीपत आणि अंबाला-दिल्ली रेल्वेसेवाही सध्या बंद आहे.आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यास जाट नेत्यांनी नकार दिला आहे. जाटांना ओबीसी कोट्यात आरक्षण देणारा कायदा संमत होईपर्यंत आरक्षण आंदोलन सुरूच राहील, असे जाट नेत्यांनी जाहीर केले.