शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जाट आंदोलन पेटले!

By admin | Updated: February 20, 2016 03:32 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी हरियाणात सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनाने शुक्रवारी हिंसक वळण घेतले असून, आंदोलकांनी राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घराला आग लावल्याचे वृत्त आहे

चंदीगड : आरक्षणाच्या मागणीसाठी हरियाणात सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनाने शुक्रवारी हिंसक वळण घेतले असून, आंदोलकांनी राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घराला आग लावल्याचे वृत्त आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर २५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. हरियाणातील २१ पैकी १९ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन पसरले असून त्यामुळे राज्यातील बससेवा आणि रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. आज रेल्वेच्या ५५0हून अधिक गाड्यांवर परिणाम झाला. आंदोलनाचे रुद्र स्वरूप पाहून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जाट समाजाला आरक्षण देण्यासाठी विधानसभेत विधेयक आणले जाईल, अशी घोषणा संध्याकाळी केली. या आरक्षणाला विरोधी पक्षांनीही सहमती दर्शवली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही जाट संघर्ष समितीने रात्रीपर्यंत आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली नव्हती.नऊ जिल्ह्यांत लष्कर तैनातहरियाणाच्या नऊ जिल्ह्यांत शुक्रवारी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे तर रोहतक आणि भिवानी येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रोहतक येथे लष्कराला पाचारण करण्यात आले असून, शूट अ‍ॅट साईटचे आदेश देण्यात आले आहेत. जिंद, झज्जर, भिवानी, हिसार, कैथल, सोनिपत, पानिपत व करनाल या जिल्ह्यांमध्ये लवकरच लष्कर रवाना केले जाणार आहे.सर्वपक्षीय बैठकहे आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी प्रशासनाने इंटरनेट आणि एसएमएस सेवा निलंबित केली आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे जाट नसल्याने या आरक्षणाच्या मागणीला विरोध करीत असल्याची टीका जाट नेत्यांनी केली. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.रेल्वेसेवेला फटकाकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी चर्चा केली. या आंदोलनामुळे राज्य सरकारने २१ फेब्रुवारीचे संत रविदास जयंतीचे सारे कार्यक्रम रद्द केले आहेत. आंदोलन मागे न घेतल्यास मुंबई व महाराष्ट्राकडून येणाऱ्या व जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होईल.> आंदोलन मागे घेण्यास जाट नेत्यांचा नकारजाट समाजाच्या लोकांनी ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनात १५ कार व ३० बसेसची तोडफोड केली; तसेच पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयावरही दगडफेक केली. तिथेही पोलिसांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. राज्यातून जाणारे ३ राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व राज्य महामार्ग बंद झालेले आहेत. आंदोलकांनी ठिकठिकाणी रेल्वेगाड्याही अडवून ठेवल्या तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळांवरच ठाण मांडले आणि तिथे अडथळे निर्माण केले. त्यामुळे दिल्ली-अमृतसर मार्ग बंद झाला आहे. सोनीपत-पानीपत आणि अंबाला-दिल्ली रेल्वेसेवाही सध्या बंद आहे.आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यास जाट नेत्यांनी नकार दिला आहे. जाटांना ओबीसी कोट्यात आरक्षण देणारा कायदा संमत होईपर्यंत आरक्षण आंदोलन सुरूच राहील, असे जाट नेत्यांनी जाहीर केले.