शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

"दहशतवादी ५-६ गोळ्या झाडल्यानंतर थांबायचे अन्..."; यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 10:32 IST

यात्रेकरुंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. बसचालकाला गोळी लागली आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत पडली. या हल्ल्यात ३० हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात्रेकरूंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले बलरामपूर, यूपीचे रहिवासी संतोष कुमार वर्मा यांनी सांगितलं की, शिवखोडीला भेट दिल्यानंतर आम्ही कटराकडे जात होतो. बस वरून खाली येत असताना एका दहशतवाद्याने रस्त्याच्या मधोमध गोळीबार सुरू केला. चालकाला गोळी लागल्याने बस दरीत पडली. दहशतवाद्यांनी सुमारे २० मिनिटे गोळीबार केला. गोळीबार थांबल्यानंतर पोलीस आले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. दहशतवादी  गोळीबार करत होते. ५-६ वेळा गोळीबार केल्यानंतर ते थांबायचे आणि पाच मिनिटांनी पुन्हा गोळीबार सुरू करायचे.

यूपीच्या गोंडा येथील रहिवासी नीलम गुप्ता यांनी सांगितलं की, आम्ही शिवखोडीला भेट दिल्यानंतर येत होतो. दहशतवाद्यांनी गोळीबार केला, गोळी बसचालकाला लागली आणि बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ती दरीत पडली. बस दरीत कोसळली तेव्हा आम्हाला दहशतवादी दिसत नव्हते. बसमध्ये लहान मुलांसह ४० लोक होते. आमच्या हातापायांना लागलं आहे. 

नीलम गुप्ता यांचा मुलगा पल्लव याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही बसमध्ये होतो आणि कोणी गोळीबार केला हे आम्हाला माहीत नाही. आवाज कमी झाल्यावर आम्ही सगळे बसमधून खाली उतरलो. काही वेळ गोळीबार झाला नाहीत, आम्ही दरीत पडलो. आमचे डोकं सीटखाली अडकलं, माझ्या बाबांनी मला बाहेर काढलं.

एका यात्रेकरूने सांगितलं की तेथे ६-७ दहशतवादी होते, त्यांचे चेहरे मास्कने झाकलेले होते. सुरुवातीला त्यांनी रस्त्यावर बसला घेरलं आणि गोळीबार केला. बस दरीत पडल्यावर ते बसच्या दिशेने खाली आले आणि सर्व लोक मारले गेले याची खात्री करण्यासाठी गोळीबार करत राहिले. आम्ही गप्प बसलो होतो. शिवखोडी येथून वैष्णोदेवीला संध्याकाळी ६ वाजता बस गेल्यानंतर ३० मिनिटांनी ही घटना घडली.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, यात्रेकरूंवरील क्रूर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही. रविवारी दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर शाह म्हणाले की, त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी आरआर स्वेन यांच्याशी चर्चा केली आणि दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी