शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:50 IST

Jammu-Kashmir: कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने होत आहे.

Jammu-Kashmir:जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने होत आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यापूर्वी तेथील स्थानिक परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल. मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, पहलगामसारख्या घटनांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. 

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासाठी पावले उचलली जात आहेत, परंतु काही विचित्र परिस्थिती आहेत. त्यांनी न्यायालयाला या प्रकरणाची सुनावणी ८ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यानुसार, न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. आता केंद्राला ८ आठवड्यात या प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागेल.

राज्याचा दर्जा देण्यात काय अडचण आहे?प्राध्यापक झहूर अहमद भट आणि कार्यकर्ते खुर्शीद अहमद मलिक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा परत न दिल्याने नागरिकांच्या हक्कांवर परिणाम होत आहे. तुषार मेहता म्हणाले, आम्ही निवडणुकीनंतर राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या भागाची परिस्थिती वेगळी आहे. त्यांनी न्यायालयाला ८ आठवड्यांचा वेळ देण्याचीही मागणी केली. 

शक्य तितक्या लवकर राज्याचा दर्जा बहाल करावा५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरची कलम ३७० रद्द करण्यात आली. कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. तेव्हापासून जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी जोर धरत आहे. विशेष राज्याचा दर्जा परत मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ११ डिसेंबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला, परंतु केंद्र सरकारला जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा लवकरात लवकर बहाल करण्याचे निर्देश दिले. 

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे पत्र अलीकडेच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजप आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी संसदेच्या चालू अधिवेशनात विधेयक मांडण्याची विनंती केली. अब्दुल्ला म्हणाले की, राज्याचा दर्जा बहाल करणे उपकार नाही तर आवश्यक सुधारणा आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाArticle 370कलम 370