शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 9:44 AM

लोकांनी फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, आझाद यांचं वक्तव्य.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress Leader) गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) हे शनिवारी जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मधील उधमपूर येथे नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकांना फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, असा सल्ला दिला. "सरपंच, जिल्हा, ब्लॉक विकास परिषदा, संसद सदस्य किंवा विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी लोकांमद्ये कधीपर्यंत फूट पाडत राहणार," असंही ते म्हणाले. 

"तुम्ही चांगलं काम, मानव सेवा आणि राजकारणाच्या जोरावर जे काही पाहिजे मिळवू शकतो. लोकांमध्ये फूट पाडून, द्वेष पसरवून आपल्या देशाचं, धर्माचं आणि समाजाचंच नुकसान होणार आहे," असं गुलाम नबी आझाद म्हणाले. यावेळी त्यांनी धर्मांतराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. "लोक स्वेच्छेने धर्मांतर करत आहेत. कोणीही तलवारीच्या धाकाने करत नाही," असंही ते म्हणाले. ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आणि शांतता, बंधुत्व आणि करोनाच्या महासाथीचा खात्म्यासाठी प्रार्थना करण्यास आपण या कार्यक्रमात सहभागी झाल्याचेही ते म्हणाले. 

"मी कायमच दरबार मूवचं समर्थन करत होतो. महाराजांनी आपल्याला तीन गोष्टी दिल्या आणि त्या जम्मू काश्मीरच्या जनतेच्या हिताच्या होत्या. त्यापैकी एक दरबार मूव होती. महाराजा (हरी सिंह) यांनी जे या प्रदेशातील नसलेल्या लोकांपासून भूमी आणि नोकऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली होती," असंही ते म्हणाले.

महाराजांचं शासन चांगलं होतंयावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरही भाष्य केलं. "आज इतक्या वर्षांनी आपण पाहतोय की महाराजा ज्यांना हुकुमशाह असं म्हटलं जायचं ते वर्तमान सरकारच्या तुलनेत चांगले होते. महाराजा जनतेच्या कल्याणासाठी काम करत होते. परंतु वर्तमान सरकारनं आमच्याकडून तिन्ही गोष्टी हिरावून घेतल्या," असंही आझाद म्हणाले.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादJammu Kashmirजम्मू-काश्मीर