शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

...तर आज संपूर्ण Pok भारताचा भाग असता; नेहरुंचे नाव घेत अमित शहांनी इतिहास काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 20:28 IST

'जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्यास दोन दिवसांचा विलंब झाला. सरदार पटेलांच्या विनंतीनंतर नेहरुंनी काश्मीरमध्ये सैन्य पाठवले.'

Jammu-Kashmir Article 370: आज राज्यसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, 2023 वर चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरुंवर निशाणा साधला. शहा यांनी पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, जर अवेळी युद्धविराम झाला नसता, तर आज पीओकेची घटना घडली नसती. जवाहरलाल नेहरू दोन दिवस थांबले असते, तर संपूर्ण पीओके तिरंग्याखाली आला असता.

सत्य बाहेर येतेच...कलम 370 वर बोलताना अमित शहा म्हणाले, स्वातंत्र्यानंतर हैदराबादमध्ये काश्मीरपेक्षाही मोठी समस्या होती, नेहरू तिथे गेले नाहीत. नेहरू जुनागड, लक्षद्वीप, जोधपूर येथे गेले नाहीत. त्यांनी फक्त काश्मीरचे काम पाहिले आणि तेही अर्धवट सोडले. काश्मीरच्या विलीनीकरणाला उशीर का झाला? इतिहास 1000 फूट खाली गाडला गेला तरी सत्य बाहेर येते.

विलीनीकरणादरम्यान एका व्यक्तीला विशेष स्थान देण्याची विनंती करण्यात आली होती आणि ती म्हणजे शेख अब्दुल्ला, त्यामुळे विलिनीकरणाला विलंब झाला. एवढ्या राज्यांचे विलीनीकरण झाले, पण कुठेही कलम 370 का लागू केले नाही. ही अट कोणी घातली आणि ती कोणी मान्य केली, याचे उत्तर देशातील जनतेला द्यावे लागेल. या प्रश्नापासून तुम्ही पळून जाऊ शकत नाही, अशी टीका शहांनी केली.

सरदार पटेलांच्या विनंतीनंतर नेहरुंनी सैन्य पाठवले...1947 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्यास दोन दिवसांचा विलंब झाला. सरदार वल्लभभाई पटेलांच्या विनंतीनंतर नेहरुंनी काश्मीरमध्ये सैन्य पाठवले. हे मी म्हणत नाहीय, तर नेहरू मेमोरिअलमधील पुस्तकात नेहरुंनीच काश्मीरमध्ये झालेली चूक मान्य केली आहे. संयुक्त राष्ट्रात जाण्याची चूक त्यांनी केली. चुकीच्या कलमाखाली संयुक्त राष्ट्रात गेले, त्यामुळे नुकसान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये ठराविक कुटुंबं सरकार चालवत होती, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

हा हिंदू-मुस्लिमचा विषय नाहीकाँग्रेसवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले की, पराभवात विजय शोधण्याची कला काँग्रेसकडून शिकली पाहिजे. आज सुप्रीम कोर्टाने कलम 370 हटवल्याचा निर्णय योग्य ठरवला, पण काँग्रेस तो निर्णय चुकीचा ठरवत आहे. काँग्रेसला वास्तव समजून घ्यावे लागेल, हा हिंदू-मुस्लिमाचा विषय नाही. काश्मीरपेक्षा गुजरात, उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे, पण तिथे फुटीरतावाद नव्हता. काश्मीरमध्ये कलम 370 असल्यामुळे फुटीरतावाद तयार झाला. फुटीरतावादामुळेच तिथे दहशतवाद फोफावला, असंही शहा यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेस