शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

'काँग्रेसला अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य नाही...', संसदेतून अमित शहांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 20:05 IST

Jammu-Kashmir Article 370: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेतून कांग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

Jammu-Kashmir Article 370: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 (Jammu-Kashmir Article 370) हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुनावला. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत त्याचे स्वागत केले. आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे ते म्हणाले. 

राज्यसभेत बोलताना शहांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेस अजूनही कलम 370 हटवण्याला चुकीचे म्हणत आहे. काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयदेखील योग्य मानत नाहीत,' अशी टीका त्यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की, 'जम्मू-काश्मीरमधील लोकांचे हक्क 3 कुटुंबांनी रोखले होते. पीओके भारताचा आहे, ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. भारताची एक इंचही जमीन आम्ही जाऊ देणार नाही. नेहरुंनी अर्धे काश्मीर सोडले, त्यांच्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाला उशीर झाला,' असंही शहा यावेळी म्हणाले.

कलम 370 इतर कोणत्याही राज्यात का लागू करण्यात आले नाही? जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर पाठवण्यास विलंब का झाला? नेहरूंनी पीओकेचा मुद्दा यूएनमध्ये का नेला? असे प्रश्नही अमित शहा यांनी उपस्थित केले. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेस कोणत्याही चांगल्या कामाचे समर्थन करत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणांच्या हातात आमच्या सरकारने लॅपटॉप दिले. इतिहास 370 चा निर्णय लक्षात ठेवेल. कलम 370 मुळे फुटीरतावादाला चालना मिळाली आणि त्यामुळेच दहशतवाद निर्माण झाला. आम्ही निवडणुका घेऊ आणि योग्य वेळी राज्याचा दर्जा देऊ, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने सोमवारी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिका रद्द केल्या आणि हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. CJI च्या नेतृत्वाखालील घटनापीठाने सांगितले की, केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय कायम राहील. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2024 पर्यंत राज्यात निवडणुका व्हाव्यात असेही सांगितले आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसBJPभाजपा