शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : तब्बल 60 विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 09:20 IST

गेल्या महिनाभरात तब्बल 60 विदेशी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये 60 विदेशी दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क असून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे.

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जवळपास 24 दहशतवादी दिसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता गेल्या महिनाभरात तब्बल 60 विदेशी दहशतवादीजम्मू-काश्मीरमध्ये घुसले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये 60 विदेशी दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी स्थानिक तरुणांचे दहशतवादी गटांमध्ये भरतीचे होण्याचे प्रमाण आतापर्यंत सर्वात कमी प्रमाण असल्याचा दावा केला आहे. गेल्या 45 दिवसांत फक्त दोन जण दहशतवादी गटांमध्ये सामील झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कर आणि सीमा सुरक्षा दल यांच्यासह अनेक यंत्रणांनी केलेल्या मूल्यमापनानंतर घुसखोरी केलेल्या विदेशी दहशतवाद्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तसेच काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क असून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. श्रीनगर परिसरात अनेक ठिकाणी दहशतवादी आढळून आले आहेत. तसेच ते उघडपणे परिसरातील दुकानदारांना धमकी देत आहेत. त्यांना दुकाने बंद ठेवण्यास आणि त्यांचा आदेश पाळण्यास सांगत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून दररोज सुरू आहे. या वर्षात पाकिस्तानने 2050 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये 21 भारतीयांना प्राण गमवावा लागला. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याआधी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. पाकिस्तानने आपल्या सुरक्षा दलांना शस्त्रसंधीचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे भारताने प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. पाकिस्ताननं नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखावी, असे आवाहन भारताकडून करण्यात आले होते. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलं जात आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने होणारी घुसखोरी रोखण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी