शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

Jammu and Kashmir: 'कुणाशी चर्चा करायची?, पाकधार्जिण्यांशी का?; अमित शहांचा सुप्रिया सुळेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 18:59 IST

Jammu and Kashmir: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व विरोधकांना सडेतोड उत्तर

ठळक मुद्देकलम 370 हटवण्याआधी केंद्र सरकारने कुणाशीही चर्चा केली नाही, असा आक्षेप विरोधी पक्षांकडून घेतला जातोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सडेतोड उत्तर दिलं.  काश्मीर खोऱ्यातील जनतेशी संवाद साधण्यास आम्ही तयार आहोत, हुर्रियत नेत्यांशी चर्चा करणार नाही.

जम्मू-काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा रद्द करण्यासारखा मोठा निर्णय घेण्याआधी, कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याआधी आणि जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचं पाऊल उचलण्याआधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कुणाशीही चर्चा केली नाही, असा आक्षेप विरोधी पक्षांकडून घेतला जातोय. हा लादलेला निर्णय आहे, घटनाबाह्य आहे, अशी टीका केली जातेय. आज लोकसभेतील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सडेतोड उत्तर दिलं.  

'काश्मीर प्रश्नावर गेली ७० वर्षं चर्चाच सुरू आहे की! तीन पिढ्या येऊन गेल्या इथे, पण मार्ग निघाला नाही. जे पाकिस्तानकडून प्रेरणा घेतात त्यांच्याशी आम्ही चर्चा करणं अपेक्षित आहे का?', असा थेट सवाल करत, आम्ही हुर्रियत नेत्यांशी चर्चा करणार नाही, असं अमित शहा यांनी ठणकावून सांगितलं. काश्मीर खोऱ्यातील जनतेशी संवाद साधण्यास आम्ही तयार आहोत, त्यांचं समाधान होईपर्यंत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. ते आमच्यासाठी विशेष आहेत, त्यांना हृदयाशी कवटाळू. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जे करावं लागेल ते करू. त्यांनी १०० मागितले, तर ११० देऊ. मोदींचं मन मोठं आहे. त्यांनी आधीच्या कार्यकाळातही जम्मू-काश्मीरसाठी सव्वा लाख कोटींचं पॅकेज दिलं होतं. यावेळी त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली. 

जम्मू-काश्मीरमधील वातावरण बिघडलंय म्हणून तिथे संचारबंदी लागू केलेली नाही, तर कुणी गैरसमज पसरवून जनतेला चिथावणी देऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून खोऱ्यात संचारबंदी लागू केलीय, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं. 

'कलम ३७०' चा वापर करून पाकिस्तानने काश्मीर खोरं सतत धुमसत ठेवलं. या देशविरोधी शक्तींना हाणून पाडण्यासाठीच या कलमातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे, असं अमित शहा यांनी नमूद केलं. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यावा, ही तिथल्या जनतेचीच मागणी होती. जम्मू-काश्मीरमधील वातावरण निवळल्यानंतर केंद्रशासित प्रदेश या दर्जाबाबत पुनर्विचार केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.  

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीSupriya Suleसुप्रिया सुळे