शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir: 'कुणाशी चर्चा करायची?, पाकधार्जिण्यांशी का?; अमित शहांचा सुप्रिया सुळेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 18:59 IST

Jammu and Kashmir: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व विरोधकांना सडेतोड उत्तर

ठळक मुद्देकलम 370 हटवण्याआधी केंद्र सरकारने कुणाशीही चर्चा केली नाही, असा आक्षेप विरोधी पक्षांकडून घेतला जातोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सडेतोड उत्तर दिलं.  काश्मीर खोऱ्यातील जनतेशी संवाद साधण्यास आम्ही तयार आहोत, हुर्रियत नेत्यांशी चर्चा करणार नाही.

जम्मू-काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा रद्द करण्यासारखा मोठा निर्णय घेण्याआधी, कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याआधी आणि जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचं पाऊल उचलण्याआधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कुणाशीही चर्चा केली नाही, असा आक्षेप विरोधी पक्षांकडून घेतला जातोय. हा लादलेला निर्णय आहे, घटनाबाह्य आहे, अशी टीका केली जातेय. आज लोकसभेतील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सडेतोड उत्तर दिलं.  

'काश्मीर प्रश्नावर गेली ७० वर्षं चर्चाच सुरू आहे की! तीन पिढ्या येऊन गेल्या इथे, पण मार्ग निघाला नाही. जे पाकिस्तानकडून प्रेरणा घेतात त्यांच्याशी आम्ही चर्चा करणं अपेक्षित आहे का?', असा थेट सवाल करत, आम्ही हुर्रियत नेत्यांशी चर्चा करणार नाही, असं अमित शहा यांनी ठणकावून सांगितलं. काश्मीर खोऱ्यातील जनतेशी संवाद साधण्यास आम्ही तयार आहोत, त्यांचं समाधान होईपर्यंत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. ते आमच्यासाठी विशेष आहेत, त्यांना हृदयाशी कवटाळू. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जे करावं लागेल ते करू. त्यांनी १०० मागितले, तर ११० देऊ. मोदींचं मन मोठं आहे. त्यांनी आधीच्या कार्यकाळातही जम्मू-काश्मीरसाठी सव्वा लाख कोटींचं पॅकेज दिलं होतं. यावेळी त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली. 

जम्मू-काश्मीरमधील वातावरण बिघडलंय म्हणून तिथे संचारबंदी लागू केलेली नाही, तर कुणी गैरसमज पसरवून जनतेला चिथावणी देऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून खोऱ्यात संचारबंदी लागू केलीय, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं. 

'कलम ३७०' चा वापर करून पाकिस्तानने काश्मीर खोरं सतत धुमसत ठेवलं. या देशविरोधी शक्तींना हाणून पाडण्यासाठीच या कलमातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे, असं अमित शहा यांनी नमूद केलं. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यावा, ही तिथल्या जनतेचीच मागणी होती. जम्मू-काश्मीरमधील वातावरण निवळल्यानंतर केंद्रशासित प्रदेश या दर्जाबाबत पुनर्विचार केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.  

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीSupriya Suleसुप्रिया सुळे