शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir: अखेर नेहरुंची 'ती' भविष्यवाणी नरेंद्र मोदींनी खरी ठरवली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 13:52 IST

देशाच्या संविधानात हे कलम असतानाही जम्मू काश्मीरला एक विशेष दर्जा दिला जात आहे

नवी दिल्ली - मोदी सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला तसेच राज्यसभेत जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडण्यात आला. जम्मू काश्मीरला केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. त्याचसोबत लडाख हे नवं स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर मुद्द्यावरुन काँग्रेस सरकारच्या धोरणांवर अनेक टीका झाली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनाही कल्पना होती ती एक दिवस कलम 370 हटविण्यात येईल. नेहरुंची ही भविष्यवाणी जम्मू काश्मीरचे तत्कालीन नेते पं. प्रेमनाथ बजाज यांना लिहिलेल्या पत्रातून समोर येते. 

काय बोलले होते पंडित जवाहरलाल नेहरु?21 ऑगस्ट 1962 रोजी कलम 370 वरुन पं. प्रेमनाथ बजाज यांच्या पत्राला उत्तर देताना जवाहरलाल नेहरु यांनी लिहिलं होतं की, 

देशाच्या संविधानात हे कलम असतानाही जम्मू काश्मीरला एक विशेष दर्जा दिला जात आहे. भरपूर काही केलं गेलं आहे आणि आणखी खूप काही करण्यासाठी अनेक अडचणी आहे. या अडचणी हळूहळू दूर होतील. हा लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. कधी कधी भावना महत्वाच्या असतात मात्र काहीतरी आणखी करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. 

जवाहरलाल नेहरु आणि पं. प्रेमनाथ बजाज यांच्यात झालेल्या या पत्रव्यवहाराचा उल्लेख जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. जगमोहन यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, नेहरु यांनी स्वत: कलम 370 मध्ये सुधारणा करण्याबाबत नकार दिला नव्हता. खूप काही केलं गेलं आहे या विधानामागे असा आशय होता की, कलम 370 मध्ये आवश्यकता भासल्यास सरकारकडून संशोधन केलं जाईल. अशावेळी विविध दुरुस्त्या आणि संशोधनातून हे कलम रद्द होईल. 

जगमोहन दोनवेळा जम्मू काश्मीरचे राज्यपाल राहिले आहेत. पहिल्यांदा एप्रिल 1984 ते जून 1989 तर दुसऱ्यांदा 1990 ते मे 1990 दरम्यान राज्यपाल होते. त्या कालावधीत जम्मू काश्मीरमध्ये अनेक निर्णायक घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, काश्मीर समस्या ही कमकुवत आणि नकारात्मक कारणांना दूर केल्यानंतरच शक्य आहे. नवीन दिशा देण्यासाठी नवीन भारताची आवश्यकता आहे. काश्मीरमधील फुटिरतावाद्यांनी त्यांची मर्यादा ओलांडली आहे. काश्मीरमधील कलम 370 हे फुटिरतावादी नेत्यांसाठी सर्वात मोठं हत्यार होतं. या कलमाचा गैरवापर अशा लोकांकडून केला जात होता. 

जगमोहन यांनी 15 ऑगस्ट 1986 मध्ये लिहिलेल्या डायरीत कलम 370 हे राज्याचं शोषण करणाऱ्या नेत्यांना समृद्ध करणारं माध्यम आहे. गरिबांना लुटणारं आणि सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्याचं काम या कलमाने केले. 

कसं लागू झालं होतं कलम 370 ?देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्याच्या एकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. 25 जुलै 1952 मध्ये मुख्यमंत्र्यांना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लिहिलेल्या पत्रात कलम 370 लागू होण्याबाबत माहिती मिळते. या पत्रात नेहरुंनी लिहिलं होतं की, जेव्हा नोव्हेंबर 1949 मध्ये भारताच्या संविधानाला अंतिम स्वरुप प्राप्त होत असताना जम्मू काश्मीरला आपल्या संविधानात विशेष दर्जा दिला गेला. 26 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रपतींनी कलम 370 ला मान्यता दिली होती. या कलमामुळे संविधानातील काही मोजकेच कायदे काश्मीरच्या भागांमध्ये लागू होत होते.    

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर