शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

Congress vs AAP: काँग्रेसला मोठ्ठा दणका! ५० वर्ष सत्ता असलेल्या जागेवर आम आदमी पक्षाने मारली बाजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 16:58 IST

Jalandhar Lok Sabha Bypoll: "जाती धर्माच्या राजकारणावर शेती-शिक्षण-आरोग्याचा विजय"

Jalandhar Lok Sabha Bypoll: जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. येथे आम आदमी पक्षाचे उमेदवार सुशील कुमार रिंकू यांना मोठा विजय मिळाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निकालावर आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात हा विजय झाल्याचे ते म्हणाले. आप सरकारच्या कामांना जनतेने मान्यता दिली आहे, असे त्यांनी निकालाचे वर्णन केले.

दुसरीकडे, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विजयावर सांगितले की, जालंधर पोटनिवडणुकीचा निकाल म्हणजे 14 महिन्यांच्या 'आप' पंजाब सरकारवर जनतेचा असलेला विश्वास आहे. जाती-धर्माच्या राजकारणाला पराभूत करून वीज, शेती, शिक्षण, आरोग्याचे राजकारण जिंकले आहे. ज्यांनी आम्हाला शिवीगाळ केली, आक्षेपार्ह टिप्पणी केली, ते आता आपला अजेंडा बदलतील, अशी अपेक्षा आहे. काँग्रेस-भाजप आणि अकाली यांनी एकत्र निवडणूक लढवली, पण तरीही ते हरले.

मतमोजणीबाबत अधिक माहिती अशी की, सुशील कुमार यांना 34 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, आप उमेदवाराला 3,02,097 मते मिळाली. तर काँग्रेसच्या करमजीत कौर चौधरी यांना 2,43,450 मते मिळाली. शिरोमणी अकाली दलाचे सुखविंदर सुखी यांना १,५८,३५४ मते मिळाली. जालंधर मतदारसंघात 16,21,800 नोंदणीकृत मतदार असून त्यापैकी केवळ 8,97,154 मतदारांनी मतदान केले. अशा प्रकारे 54.70% मतदान झाले.

जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 9 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली . मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मतमोजणी केंद्रांभोवती सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. निमलष्करी दल आणि पंजाब पोलिसांकडून त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

पोटनिवडणुका का झाल्या?- काँग्रेस खासदार संतोख चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने जालंधरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. भारत जोडो यात्रेदरम्यान पंजाबमध्ये पोहोचल्यावर त्यांनीही त्यात भाग घेतला होता. यात्रेत सहभागी होत असताना 14 जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

कोणत्या पक्षाचे तिकीट कोणाला मिळाले?- जालंधर पोटनिवडणुकीत एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. त्यात 15 पुरुष आणि चार महिलांचा समावेश होता. आम आदमी पार्टीने सुशील कुमार रिंकू यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे, काँग्रेसने चौधरी कुटुंबावर विश्वास दाखवत येथून संतोख यांच्या पत्नी करमजीत कौर यांना तिकीट दिले. एसएडी-बसपच्या वतीने सुखविंदर कुमार सुखी मैदानात होते. भाजपबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी इंदर इक्बाल सिंग अटवाल यांना तिकीट दिले.

जालंधर पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी 27 दिवस सतत प्रचार केला होता. ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे, कारण ती राज्यातील 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रंगणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकPunjabपंजाबAAPआपcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल