शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Congress vs AAP: काँग्रेसला मोठ्ठा दणका! ५० वर्ष सत्ता असलेल्या जागेवर आम आदमी पक्षाने मारली बाजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 16:58 IST

Jalandhar Lok Sabha Bypoll: "जाती धर्माच्या राजकारणावर शेती-शिक्षण-आरोग्याचा विजय"

Jalandhar Lok Sabha Bypoll: जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. येथे आम आदमी पक्षाचे उमेदवार सुशील कुमार रिंकू यांना मोठा विजय मिळाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निकालावर आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात हा विजय झाल्याचे ते म्हणाले. आप सरकारच्या कामांना जनतेने मान्यता दिली आहे, असे त्यांनी निकालाचे वर्णन केले.

दुसरीकडे, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विजयावर सांगितले की, जालंधर पोटनिवडणुकीचा निकाल म्हणजे 14 महिन्यांच्या 'आप' पंजाब सरकारवर जनतेचा असलेला विश्वास आहे. जाती-धर्माच्या राजकारणाला पराभूत करून वीज, शेती, शिक्षण, आरोग्याचे राजकारण जिंकले आहे. ज्यांनी आम्हाला शिवीगाळ केली, आक्षेपार्ह टिप्पणी केली, ते आता आपला अजेंडा बदलतील, अशी अपेक्षा आहे. काँग्रेस-भाजप आणि अकाली यांनी एकत्र निवडणूक लढवली, पण तरीही ते हरले.

मतमोजणीबाबत अधिक माहिती अशी की, सुशील कुमार यांना 34 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, आप उमेदवाराला 3,02,097 मते मिळाली. तर काँग्रेसच्या करमजीत कौर चौधरी यांना 2,43,450 मते मिळाली. शिरोमणी अकाली दलाचे सुखविंदर सुखी यांना १,५८,३५४ मते मिळाली. जालंधर मतदारसंघात 16,21,800 नोंदणीकृत मतदार असून त्यापैकी केवळ 8,97,154 मतदारांनी मतदान केले. अशा प्रकारे 54.70% मतदान झाले.

जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 9 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली . मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मतमोजणी केंद्रांभोवती सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. निमलष्करी दल आणि पंजाब पोलिसांकडून त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

पोटनिवडणुका का झाल्या?- काँग्रेस खासदार संतोख चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने जालंधरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. भारत जोडो यात्रेदरम्यान पंजाबमध्ये पोहोचल्यावर त्यांनीही त्यात भाग घेतला होता. यात्रेत सहभागी होत असताना 14 जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

कोणत्या पक्षाचे तिकीट कोणाला मिळाले?- जालंधर पोटनिवडणुकीत एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. त्यात 15 पुरुष आणि चार महिलांचा समावेश होता. आम आदमी पार्टीने सुशील कुमार रिंकू यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे, काँग्रेसने चौधरी कुटुंबावर विश्वास दाखवत येथून संतोख यांच्या पत्नी करमजीत कौर यांना तिकीट दिले. एसएडी-बसपच्या वतीने सुखविंदर कुमार सुखी मैदानात होते. भाजपबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी इंदर इक्बाल सिंग अटवाल यांना तिकीट दिले.

जालंधर पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी 27 दिवस सतत प्रचार केला होता. ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे, कारण ती राज्यातील 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रंगणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकPunjabपंजाबAAPआपcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल