शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

ज्योतिरादित्य शिंदेंच्या जाण्यानं काँग्रेसलाच फायदा, भाजपचं नुकसान; दिग्विजय सिंहांच्या मुलानं केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:00 IST

मध्ये प्रदेशातील गुनाचे खासदार सिंधिया यांनी मार्च 2020मध्ये भाजपत प्रवेश केला होता. त्यांच्या सोबतच अनेक आमदारांनी काँग्रेसला राम-राम ठोकला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील काँग्रेस सरकार कोसळले होते.

ग्वाल्हेर - ज्योतिरादित्य शिंदे पक्ष सोडून गेल्याने मध्य प्रदेशकाँग्रेसमधील गटबाजी संपली आहे. तर आत भाजपमध्येच तीन गट तयार झाले आहेत, असा दावा काँग्रेस नेते तथा दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह यांनी बुधवारी केला. शिंदे यांनी गेल्या वर्षी काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपचा भगवा हाती घेतला आहे.

मध्ये प्रदेशातील गुनाचे खासदार सिंधिया यांनी मार्च 2020मध्ये भाजपत प्रवेश केला होता. त्यांच्या सोबतच अनेक आमदारांनी काँग्रेसला राम-राम ठोकला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील काँग्रेस सरकार कोसळले होते. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा एकदा सरकार स्थापन केले. सिंधिया यांना अलीकडेच मोदी सरकारमध्ये नागरी उड्डाण मंत्री करण्यात आले आहे.

ग्वाल्हेर भागातील पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी आलेले माजी मंत्री जयवर्धन सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, "शिंदे होते तोपर्यंत पक्षात गटबाजी होती. आता ती संपली आहे. पण, शिंदे भाजपमध्ये गेल्याने तेथे 'शिवराज भाजप', 'महाराज भाजप' आणि 'नाराज भाजप',असे तीन गट तयार झाले आहेत. यावेळी, ज्या नेत्यांचे फोटो रेशन वितरणासाठी असलेल्या बॅगवर छापण्यात आले होते, त्या नेत्यांवरही टीका केली.  "या भागातील लोक पुराचा सामना करत असतानाच, सत्ताधारी पक्षाचे लोक मात्र 'अण्ण उत्सव' साजरा करत आहेत. खरे तर ही योजना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने सुरू केली होती. एक दिवस भाजपचे हे नेते धान्यावरही त्यांचे फोटो छापतील," असा टोला जयवर्धन सिंह यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंह